‘महाभारत’ मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणीत आहेत. अभिनेते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पत्नी स्मिता गाते यांच्या विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली असून हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी पत्नीवर राग काढला होता. अशातच नितीश यांनी ,१३ वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध नव्हते हे भाष्य लक्षवेधी ठरलं. (Nitish Bharadwaj On Wife)
नितीश भारद्वाज आपल्या मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. नितीश यांना नोकरी करु द्यायची नाही, असा आरोप त्यांची आयएएस पत्नी स्मिता यांनी केला. नितीश म्हणाले की, “त्यांना जगाला दाखवायचे आहे की त्यांचे पती मागासलेल्या विचारसरणीचे आहेत. नितीश यांनी अनेक पुरावे दाखवले की, तिला निलंबित करण्यात आले आहे. तेव्हा त्यांनी तिला नोकरी परत मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले”.
नितीश यांनी सांगितले की, “त्यांच्या पत्नीने यापूर्वीच दोन घटस्फोट घेतले आहेत”. ते म्हणाले की, “२०१६ पर्यंत सातवे वेतन आयोग लागू केला जाईल. यानंतर त्या राजीनामा देणार आहेत. तिने सांगितले की, तिला चांगले कौटुंबिक जीवन हवे आहे आणि ती सरकारी नोकरीला कंटाळली आहे. लग्नाबाबत मी ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ती चांगली स्त्री आहे म्हणून त्यांनी तिच्याशी लग्न केले”. नितीश यांनी सांगितले की, “मे २०१२मध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीने पुण्यात घर घेतले. इंडस्ट्रीतील लोकांना कर्ज मिळत नाही कारण त्यांना निश्चित पगार मिळत नाही, म्हणून त्यांच्या पत्नीने कर्ज घेतले पण ते मला परत करावे लागले. फ्लॅटची ७० टक्के रक्कम दिली”. यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरुच होती.
नितीशने सांगितले की, “ती अतिशय उद्धट स्वभावाची आहे आणि ती नीट वागत नाही. जेव्हा तो तिच्या पहिल्या पतीला भेटला तेव्हा त्याला समजले की मुख्य समस्या ही आहे की तिला स्त्री-पुरुष संबंधात राहायचे नव्हते. माझा प्रश्न आहे मग तू लग्न का करतोस? तू तीन वेळा लग्न का केलेस? तिला लग्न न मोडता एकट्याने वैवाहिक जीवन जगायचे आहे”. नितीश यांनी सांगितले की, सातवा वेतन आयोग आल्यानंतर त्यांच्या पत्नीने मी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. या बहाण्याने अनेक गोष्टी मान्य करून घेतल्याने त्याला धक्काच बसला. नितीश म्हणाले की, त्यांच्या पत्नीचा पगार दरमहा साडेतीन लाख रुपये आहे, तरीही ते मुलांचा सर्व खर्च उचलत आहेत. नितीश पुढे म्हणाले, “१३ वर्षे झाली माझे त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध नाहीत. मी जेव्हाही तिला भेटायला जायचो तेव्हा ती वेगळ्या खोलीत राहायची. ती मुलांबरोबर आणि मी वेगळे. कधी-कधी मुलं माझ्याजवळ येऊन झोपायची, मी त्यांना लोरी गाऊन झोपायला लावत असे पण आमच्यात शारीरिक संबंध नव्हते. ती नाकारायची”.