यंदाचा आयपीएल हंगाम हा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे त्याचं कारण आहे प्रत्येक संघात बदलणारं नेतृत्व आणि त्यामुळे संघाचं होणारं खराब प्रदर्शन. नुकतीच मुंबई- हैद्राबाद यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात हैद्राबादने पहिल्यांदा फलंदाजी करत तब्बल २७७ रणांची धावसंख्या उभी करत मुंबईची सामना जिंकण्याची वाट अवघड केली. तसेच मुंबईच्या गोलंदाजी दरम्यान गोलंदाजांच्या होणाऱ्या बदलांवर चाहत्यांकडून तसेच काही माजी क्रिकेटपटुंकडुन जोरदार टीका केली जात आहे.(MI VS SRH 2024)
मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय. या सामन्या दरम्यान गोलंदाजांच्या होणाऱ्या फटकेबाजीवरून हार्दिकला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. सामन्यात बुमराह सारखा उत्कृष्ट असताना त्याच्या गोलंदाजीला प्राधान्य का देण्यात आले नाही यावरून प्रेक्षक चांगलेच संतापलेले दिसत आहेत. प्रेक्षकांसह माजी क्रिकेटपटू इरफान पठाण व युसूफ पठाण यांनी देखील ट्विट करत हार्दिकच्या सामन्यातील प्रदर्शनावर टीका केली आहे.
The captaincy of Hardik Pandya has been ordinary to say the least. Keeping Bumrah away for too long when the carnage was on was beyond my understanding.
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 27, 2024
इरफान पठाण ने ट्विट करत लिहिलं आहे,”हार्दिकचे प्लॅन्स माझ्या समजण्यापलीकडेचे आहेत बुमराह सारखा अनुभवी गोलंदाज असताना त्याने त्याला योग्य वेळी गोलंदाजीची का नाही बोलावले हे अजून समजत नाहीये.”तसेच क्रिकेटपटू युसूफ पठाणने देखील ट्विटद्वारे पोस्ट करत चांगलीच टीका केली आहे,”हैद्राबादने केवळ ११ षटकात तब्बल १६० इतकी धावसंख्या उभी केली तोपर्यंत बुमराह सारख्या अनुभवी गोलंदाजाला का लांब ठेवण्यात आले हे अजूनही स्पष्ठ झाले नाही” असं विधान युसूफ पठाणने ट्विटमार्फत केले आहे.(MI VS SRH 2024)
#SRH ne 11 overs mein hi 160+ score kar liya hai, and @Jaspritbumrah93 ko abhi tak sirf ek over hi kyun diya gaya? Your best bowler ko toh ab bowl karna chahiye. This seems like bad captaincy to me. #IPL #SRHvsMi
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) March 27, 2024
आणखी वाचा- आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
हार्दिकच्या कर्णधार पदावरून टीकेनंतर इरफान पठाणने त्याच्या फलंदाजीवरून देखील त्याला खडेबोल सुनावले आहेत. ट्विट करत इरफान म्हणाला,” संपूर्ण टीम २७७ रणांचा पाठलाग करत असताना तब्बल २००च्या स्ट्राईकरेट ने खेळत होती पण कर्णधार हार्दिक मात्र केवळ १२०च्या स्ट्राईक रेटने खेळताना दिसला.”
इरफान व युसूफसह क्रिकेटप्रेमींकडून देखील हार्दिकवर जोरदार टीका केली जात आहे.