Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेली कित्येक वर्ष आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. पंकज यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृतरित्या देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. पंकज उधास यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. (Pankaj Udhas Death News)
पंकज यांची मुलगी नायाब उधासने वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली. तिने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असं नमुद केलं आहे की, “आम्हाला हे सांगण्यात खूप दुःख होत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचं २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारी होते”. पंकज यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
‘आजतक’च्या वृत्तानुसार पंकज यांना पीआर टीमने सांगितलं की, मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सकाळी ११.०० वाजता पंकज यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून आजाराशी ते झुंज देत होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत आणखीनच खालावली होती. पंकज यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवनही हादरुन गेले आहेत. संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं असल्याचं शंकर महादेवन यांचं म्हणणं आहे.
संगीत विश्वामध्ये पंकज यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जात होतं. ‘चिट्ठी आई है’ या गझलमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. १९८६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाम’ चित्रपटामध्ये या गझलचा समावेश होता. ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘चले तो कट ही जाएगा’, ‘तेरे बिन’ सारख्या गझलला त्यांनी आवाज दिला. आज पंकज यांच्या निधनानंतर चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. ्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअरकेल