Bharati Singh Mother Father : सध्या कॉमेडी क्वीन भारती सिंग चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. इतकंच नाहीतर या मुलाखतीदरम्यान भारतीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खुलासे केले. नेहमीच सर्वांना हसवणारी भारती सिंगने तिच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. यावेळी या गोष्टीचा खुलासा झाला की, एखाद्या गोष्टीला ती इतकी घाबरते की ती तिच्या मनातून जात नाही. या मुलाखतीदरम्यान भारतीने तिला विमानप्रवासाचा फोबिया असल्याचं स्पष्ट केलं. विमान अपघातानंतर ती पावसाळ्यातील विमानप्रवास शक्यतो टाळते.
भारतीने सांगितलं की, “ती पावसाळ्याच्या ४ महिन्यांमध्ये कामही घेत नाही कारण तिला विमान प्रवासाची भीती वाटते. याशिवाय, तिनं असंही सांगितलं की, आता ती संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी जाणार आहे. म्हणून तिनं ठरवलं की, तिचं कुटुंब २ विमानांमध्ये जाईल”. यावेळी भारतीने असं करण्यामागचं कारण सांगत गमतीनं म्हटलं की, “जर आपण एका विमानात गेलो तर मागे सही करणारे कोणीही नसेल”. यानंतर, भारतीला विचारण्यात आलं की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती कोणती आहे? यावर अभिनेत्री म्हणाली, “मला माझ्या आईची सर्वात भीती वाटते. मला माझ्या आईच्या मरणाची भीती वाटते”.
आईबाबत बोलताना भारती म्हणाली, “मला असं वाटतंय की, मी माझ्या आईशिवाय श्वास घेऊ शकणार नाही. गेल्या वर्षी माझी आई खूप आजारी पडली. तिला किडनीचा त्रास होता म्हणून तिचं ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. तेव्हापासून मी मॅनिफेस्ट करायला सुरुवात केली”. भारतीने सांगितलं की, जेव्हा तिच्या आईची शस्त्रक्रिया सुरु होती, तेव्हा तिला वाटलं की, जेव्हा ती बरी होईल तेव्हा ती आईबरोबर जगन्नाथ पुरीला दर्शनासाठी जाईल. ट्रान्सप्लांट केल्याच्या १ वर्षानंतर तिला जे वाटलं होतं ते घडलं. भारती म्हणाली की, ती तिच्या आईला देव मानते. जर तिला तिचा मार्ग मिळाला तर ती तिच्या आईसाठी एक मंदिर बांधेल आणि तिथे तिची मूर्ती ठेवेल.
आणखी वाचा – “माझ्यावर घाणरेडे विनोद करुन प्रसिद्धी मिळवली”, अभिनेत्रीचा कपिल शर्माला टोला, म्हणाली, “त्याचं वाईट…”
भारतीने मुलाखतीमध्ये तिच्या वडिलांबद्दलही सांगितलं. भारती केवळ दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यांना कॉलरा झाला आणि त्यात ते दारु प्यायले. त्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. भारती पुढे म्हणाली, की आजही जर कोणी तिच्या घरात तिच्या वडिलांचा फोटो लावला तर तिला तो काढून टाकावासा वाटतो. भारतीने तिच्या वडिलांना कधीही पाहिलं नाही, म्हणून ते तिला अनोळखी वाटतात. म्हणूनच तिच्या घरात तिच्या वडिलांचा फोटो नाही कारण तिला तिच्या वडिलांची एकही आठवण नाही.





