बॉलिवूडमध्ये प्रत्येक जण आपले काही ना काही अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी येत असतो. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावले आहे. काही कलाकारांनी उत्तुंग यशही पाहिले आहे पण त्यांच्या एका चुकीमुळे मोठे परिणाम भोगावे लागले आहेत. चुकीच्या निर्णयामुळे करिअरदेखील सोडावे लागले आहे. असेच निर्णय चुकल्याने आपल्या करिअरपासून दूर गेलेल्या एका अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (actress reena roy life)
८० च्या दशकामध्ये आपल्या सौंदर्याने व अभिनयाने भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे रिना रॉय. करिअर चांगले सुरु असतानाच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलं आणि त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरल उतरती कळा लागली. करिअर डबघाईला जात असतानाच त्यांचा त्या कालावधीमध्ये घटस्फोटही झाला आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण त्यांनी नेमकी कुठं चूक केली याबद्दल आपण माहिती घेऊया.
रिना यांनी आतापर्यंत मेगास्टार अमिताभ बच्चन, जितेंद्र , राज बब्बर, ऋषि कपूर अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. रिना यांचे खूप चाहते होते. त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्या ‘जरूरत’ या चित्रपटातून अभिनय करण्यास सुरुवात केली.
‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार त्यांचे खरे नाव सायरा अली होते. पण त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव रुपा राय ठेवले गेले. पण त्यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा बी. आर. चोप्रा यांनी त्यांचे नाव बदलून रिना रॉय असे ठवले. खूपच कमी कालावधीमध्ये त्यांनी खूप नाव कमावले. त्यांनी ‘कालीचरण’, ‘जखमी’, ‘उधार का सिंदूर’ व ‘नागिन’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे करिअर चांगले सुरु असतानाच १९८३ साली त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्याबरोबर लग्न केले आणि त्यानंतर त्यांनी भारत सोसून पाकिस्तानात गेल्या. लग्नानंतर त्या अभिनय क्षेत्रापासूनही दूर झाल्या. त्यांना लग्नानंतर एक मुलगी झाली. पण लग्नाच्या संत वर्षानंतरच त्या दोघांचा घटस्फोट जल. अशातच त्यांनी मुलीचा ताबा स्वतःकडेच ठेवला. मुलीचे नाव जन्नत होते, पण ताबा मिळाल्यानंतर तिचे नाव बदलून सनम रॉय असे ठेवले.
घटस्फोटानंतर १९९२ साली त्या पुन्हा भारतात परतल्या आणि पुन्हा एकदा अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या ‘आदमी खिलोना है’ हा चित्रपट केला. या चित्रपटाला खूप यश मिळाले. तसेच ‘अजय’, ‘गैर’, व रेफ्यूजी’ या चित्रपटांमध्येदेखील दिसून आल्या होत्या. पण त्यांना अधिक यश मिळू शकले नाही. नुकत्याच त्या ‘इंडियन आयडॉल’ व ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या दिसल्या. सध्या त्या बहीण बरखा यांच्या बरोबर अभिनय शिक्षण देत आहेत.