Karisma -Sunjay Arrange Marriage : इंग्लंडच्या विंडसरमध्ये पोलो खेळत असताना करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. संजय कपूरच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे. सामन्यादरम्यान, त्याने चुकून एक मधमाशी गिळंकृत केली, ज्यामुळे गंभीर एलर्जी त्यांना झाली आणि त्याचवेळी श्वास कोंडल्याने हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी वैद्यकीय मदत असूनही, त्यांना वाचवता आले नाही. अखेर आज सात दिवसांनी दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. निधनावेळी संजय लंडनमध्ये होते, त्यामुळे काही कागदी व्यवहारामुळे त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात त्यांना उशीर झाला. आज संजय यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून करिष्मा तिच्या दोन्ही मुलांसह दिल्लीला रवाना झाली आहे.
करिश्मा कपूर हिने २९ सप्टेंबर २००३ रोजी मुंबई येथे संजय कपूरबरोबर शाही थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने करण्यात आले आणि करिश्मा आणि तिचे वडील रणधीर कपूर यांनी त्यावेळी सुरुवातीच्या मुलाखती दरम्यान याची पुष्टी केली. लग्नाबद्दल विचारले असता रणधीर कपूर यांनी यू रेडिफला सांगितले, “आम्ही तुम्हाला काही दिवसांत तारीख सांगू शकू. लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे. करिश्मा आणि संजय दोघेही एकमेकांना ओळखतात, परंतु मित्रांच्या मदतीने लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे”. करिश्मा तिच्या वतीने म्हणाली, “माझे पालक माझ्यासाठी निर्णय घेतील तो अखेरचा असेल.”
आणखी वाचा – हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी, काजोलचा मोठा दावा, म्हणाली, “देवाच्या कृपेने मला…”

तथापि, करिश्मा आणि संजय यांचे लग्न काही वर्षात तुटले. या जोडीला मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलेही आहेत. करिश्मा आणि संजय यांचे लग्न कटुतेने भरलेले होते. अभिनेत्रीने हनीमूनच्या वेळीही तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता आणि तिचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, संजयने असा दावा केला की करिश्माने केवळ त्याच्या संपत्तीसाठीच लग्न केले होते. या जोडीच्या घटस्फोटाची प्रक्रिया बर्याच वर्षांपासून सुरु होती. शेवटी २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बॉलिवूडमधील सर्वात वाईट ब्रेकअप म्हणून या जोडीचे नाव नोंदवले गेले.
आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”
करिश्मापासून घटस्फोटानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केले. प्रियाचे विक्रम चतवालशी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगी सफिरा चतवाल आहे, तर २०१८ मध्ये संजय आणि प्रिया यांनी एका मुलाचे म्हणजेच अझारियसचे स्वागत केले.





