शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायमध्ये सतत व्हायची भांडणं, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेला, “एक मत होत नाही आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 31, 2024 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्यामधील भांडणाची कारणं  आली समोर

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन यांच्यामधील भांडणाची कारणं आली समोर

बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी अधिक चर्चेत राहिली आहे. २० एप्रिल २००७ साली दोघही लग्नबंधनात अडकले होते. २०१६ साली त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव आराध्या असे ठेवण्यात आले. लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक चर्चा झालेल्या दिसून आल्या आहेत. दोघंही आता घटस्फोट घेणार असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. परंतु या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे? याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. अशातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. (abhishek bachchan and aishwarya rai bachchan fight)

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. तसेच त्याने सांगितले होते की, “मी अजूननही विवाहित आहे”, यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या व अभिषेक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्याने अभिषेकबरोबर रोज भांडणं होतात असे सांगितले होते.

आणखी वाचा – Emergency चित्रपटामुळे कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, “इंदिरा गांधीची हत्या न दाखवण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

ऐश्वर्या व अभिषेक यांनी २०१० साली ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारले होते की, “तुमच्यामध्ये किती वेळा भांडणं होतात?”, त्यावर ऐश्वर्याने उत्तर दिले की, “आमच्यामध्ये रोज भांडणं होतात”, त्यावर अभिषेक म्हणाला की, “पण ती भांडणं नसतात. एखाद्यावेळी आमची मत एक होत नाहीत. ही भांडणं गंभीर स्वरूपाची नसतात. पण आमच्यात अशी भांडणं झाली नाही तर आम्ही कंटाळू”.

आणखी वाचा – “लक्ष्याच विंगेत उभं राहून लेकाला…”, वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, म्हणाला, “माझं पहिलं नाटक त्यांनी बघितलं असतं तर…”

त्यानंतर भांडण संपवण्यासाठी अभिषेक स्वतः पुढाकार घेत असल्याचेही सांगितले होते. भांडणं संपवल्याशिवाय झोपायचं नाही असे ऐश्वर्याने नियम घालून दिले आहेत. तसेच खूप झोप येत आहे किंवा झोपायला जायचं आहे या विषयांवरुनच अधिक भांडणं होतात असे अभिषेकने सांगितले होते. तसेच सर्व महिला बेस्ट आहेत आणि त्या नेहमीच बरोबर असतात असेही तो म्हणाला. जमेल तितक्या लवकर पुरुषांनी हे मान्य करावे असे तो म्हणाला होता. दरम्यान अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘हाऊसफुल ५’, ‘किंग’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.  

Tags: abhishek bachchanaishwrya rai bachchanfight
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Shreya ghoshal on kolkata rape case

कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर श्रेया घोषालचा मोठा निर्णय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, कॉन्सर्टही रद्द केलं आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.