Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावर सध्या एकाच गोष्टीची चर्चा पाहायला मिळत आहे ती म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ची… ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. १०० ऐवजी ७० दिवस हा खेळ चालणार असून येत्या रविवारी ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. या घरात सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासूनच राडे, भांडण वाद आणि अनेक विवाद पाहायला मिळाले. यापैकी निक्की व आर्या यांचा राडा चांगलाच गाजला. परिणामी आर्याला ‘बिग बॉस मराठी’चे घर सोडावे लागले. पण याबद्दल तिच्या चाहत्यांकडून आणि अनेक कलाकारांकडून पाठिंबा मिळाला होता. (Sangram Chougule On Nikki and Aarya Jadhao Fight)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याची घटना घडली. निक्कीने यानंतर घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. “रागाच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली”, असं आर्याने कबूल केलं असलं तरी ‘बिग बॉस’च्या घराच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे आर्याला बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. ‘बिग बॉस’ यांना आर्याची ही वागणूक खटकली असली तरी नेटकऱ्यांनी आणि काही कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. निक्कीच्या कानशिलात लगावल्याबद्दल आर्याचं सोशल मीडियावर कौतुक झालं होतं. अशातच आता या प्रकरणावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामधील पहिले वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संग्राम यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यात त्यांना निक्की-आर्या यांच्या भांडणाबद्दल विचारण्यात आले. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “त्यावेळी घरातल्या कॅप्टनचा निर्णय होणार होता. भांडणं करता करता काय झालं की, दरवाजा बंद झाला होता. निक्की दरवाजा ढकलत होती. दरवाजा ढकलत असताना निक्कीने मारायचा प्रयत्न केला आणि नेमका दरवाजा ढकलताना निक्कीचा हात आर्याच्या गालाला लागला. त्यामुळे आर्याला वाटलं की, निक्कीने मारलं तिला. पण कॅमेरापुढे काय दिसेल माहित नाही ना. निक्कीचा हात लागल्यावर आर्याने अशी फाडकन मारली होती. मला आठवतंय आम्ही ५० मीटरवरुन पळत आलो होतो. एवढ्या जोरात मारली होती. नंतर सगळ्यांनी आर्याला विचारलं तिने आधी मारलं की तू मारलं. आर्या म्हणाली तिने मारलं”.
आणखी वाचा – जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर बंदी, चेहऱ्याला काळंही फासलं अन्…; अभिनेत्रीवर नागरीक संतप्त, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या नवीन सीझनने आतापर्यंत ६५ हुन अधिक दिवसांचा टप्पा पार केला असून या घरात आता फक्त सात सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता अंतिम लढतीसाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे अवघ्या काही दिवसांतच या शोला नवीन विजेता मिळणार आहे आणि यासाथी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.