बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आपला बहुचर्चित कार्यक्रम घेऊन आला आहे. छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली. इतर पर्वांप्रमाणे हा १७वा सीजन बराच धमाकेदार असणार आहे. या पर्वातील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पहिलाच दिवस एका एक्स कपलने बराच गाजवला. त्यांच्यातील वादामुळे चक्क सलमान खानही हैराण झाला होता.(Big boss session 17 premier night ex-couple accusation)
लोकप्रिय अभिनेता अभिषेक कुमार व अभिनेत्री ईशा मालवीय यांनी ‘उडारिया’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण ब्रेकअपनंतर हे दोघं आता बिग बॉसच्या १७व्या पर्वात एकत्र दिसत आहेत. पण या जोडप्याने बिग बॉसच्या पहिल्याच रात्री सलमान खानसमोर खूप तणावजन्य परिस्थिती निर्माण केली. अगदी स्टेजवरच दोघांमध्ये त्यांच्यातील वैयक्तिक वादावरुन भांडण सुरु झाली. कार्यक्रमादरम्यान सलमान खानबरोबर बोलत असताना, ईशा व अभिषेक यांनी त्यांच्या नात्यातील मतभेद व समस्यांबद्दल खुलासा केला. यावेळी वेगळं होण्याचंही कारण स्पष्ट केलं. ईशाने अभिषेकवर बरेच आरोप केले. यावेळी तिच्यावर अभिषेकने शारीरिक हिंसाचार केल्याचाही आरोप केला.
ईशा म्हणाली, “कोणत्याही व्यक्तीवर शारीरिक हिंसाचार करणं ही अशी गोष्ट आहे जी मी सहन करू शकत नाही”. यावर उत्तर देताना अभिषेक म्हणाला, “जर ही माझ्या चेहऱ्यावर नखाने वार करत असेल तर मी तिला थांबवणार नाही का?”. यावेळी त्याचा आवाज चढला होता. सलमानने त्याला शांत होण्यास सांगितलं आणि सलमान ईशाला म्हणाला, “नॅशनल टिव्हीवर अशा वैयक्तिक गोष्टींचा खुलासा न करण्याची समज तुला असणं गरजेचं आहे आणि अभिषेकलाही स्वतःची सुरक्षा करण्याचा पुर्ण अधिकार आहे”.
ईशा व अभिषेकमधील वाद तोपर्यंत चालू होता जोपर्यंत सलमानने त्यांच्यात मध्यस्थी केली नाही. ‘बिग बॉस १७’ च्या घरात ईशा अभिषेकसह अंकिता लोखंडे-विकी जैन, ऐश्वर्या शर्मा-नीलभट्ट, मुनावर फारुकी, जिग्ना व्होरा, मन्नारा चोप्रा असे बरेच सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून या पर्वात भाग घेतला आहे.