छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेले अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारे गुरुचरण सिंह यांनीही या शोमधून वर्षानुवर्षे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केलं आहे. मात्र नंतर तो शोमधून अचानक गायब झाला. जेनिफर मिस्त्रीला ज्या पद्धतीने बाहेर फेकले होते, त्याच पद्धतीने निर्मात्यांनी आपल्याला हाकलून दिल्याचा खुलासा त्याने केला होता. २०१२ मध्ये त्यांनी मला शोमधून रिप्लेस केलं. याबद्दल आता स्वत: निर्मात्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. निर्माते असित मोदी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना गुरुचरणच्या शोमधून बाहेर पडण्याचे खरे कारण सांगितले आहे. (asit modi on gurucharan singh)
याबद्दल असित मोदी यांनी सांगितले की, त्याचे आणि गुरुचरणचे जवळचे नाते आहे आणि त्याचे कुटुंबदेखील त्याच्यावर खूप प्रेम करते. याबद्दल ते असं म्हणाले की, “गुरुचरण हे खूप चांगले व्यक्ती आहेत आणि मी त्यांच्याशी भावनिकरित्या जोडलेलो आहे. माझी पत्नी आणि मुले त्याच्यावर प्रेम करतात”. असित मोदी पुढे म्हणाले, “मधल्या काळात तो अनेक समस्यांमधून जात होता आणि मी त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करतो की, तो या कठीण परिस्थितीतून बाहेर येईल” निर्मात्याने पुढे खुलासा केला की, गुरुचरणने स्वतः शो सोडला आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता.
आणखी वाचा – “आवडी आली” म्हणत अंकिता वालावलकरने घेतली महागडी आलिशान कार, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला खास फोटो
याबद्दल असित मोदी म्हणाले की, “’गुरुचरणने स्वतःहून शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. आम्ही त्याला कधीही सोडण्यास सांगितले नाही. आता त्यालाही वाटतं की, तो या शोचा भाग व्हायला हवा होता आणि त्याला हा शो आवडतो”. असित मोदी पुढे म्हणाले की, “‘तारक मेहता…’ला १६ वर्षे झाली आहेत आणि शो सोडण्यामागे लोकांची वैयक्तिक कारणे आहेत आणि कोणीतरी तुमच्या शोचा कायमचा भाग असेल अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. बहुतेक कलाकार अजूनही संबंधित आहेत”.
आणखी वाचा – जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”
दरम्यान, गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त नुकतंच समोर आले. यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. गेल्या १९ दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली.





