‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर अप्पीने अर्जुनसमोर प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुनला अप्पीच्या मनातलं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण याच्या पलीकडे अर्जुन गेलेला असतो. आणि अर्जुनने साखरपुडाही केलेला असून त्याचं लग्न ठरलेलं असतं. तर रूपालीच्या सांगण्यावरुन आर्या ही तिथे पोहोचलेली असते. आर्या सुद्धा अप्पी व अर्जुनचे बोलणं ऐकते. तेव्हा अप्पी अर्जुनला सांगते की, आपण एकत्र राहू या. तू एकदा विचार कर अमोलला आपल्याला एकत्र वाढताना पाहायला मिळेल आणि आपण एकत्र म्हातारेसुद्धा होऊ. एकदा विचार कर, मात्र अर्जुन काहीच बोलत नाही. (Appi Amchi Collector Serial Update)
अर्जुन सांगतो आता मला काय बोलावे काहीच कळत नाही आहे. तितक्यात आर्या तिथे येते आणि त्यांना थांबवते आणि सांगते की, इथे काय चाललंय?, शेवटी तुला जे हवं ते तूच करायला निघालीस ना? त्या मुलाचा वापर करुन तू अर्जुनबरोबर पुन्हा एकत्र यायचा विचार करत आहेस. अर्जुनचा आता साखरपुडा झाला आहे. यावर अर्जुन आर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत सांगतो की तू काहीच गैरसमज करुन घेऊ नकोस. मी तुझा विश्वासघात होऊ देणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. मात्र आर्या काहीच ऐकत नाही तेव्हा अप्पी तिला समजावते, मात्र ती अप्पीलाही काहीच बोलू देत नाही. तेव्हा आर्याच अर्जुनला सांगते की, आता तिने विचारलेला प्रश्नाचं तू माझ्यासमोर उत्तर दे. तेव्हा अर्जुन नाही असे उत्तर देतो.
अखेर अर्जुनने अप्पीचं प्रेम नाकारलेलं असतं. त्यामुळे अप्पीचा सुद्धा हिरमोड होतो तर इकडे रूपाली कदम व अमोल यांनी अप्पी व अर्जुन यांनी एकत्र यावे म्हणून प्लॅन केलेला असतो असा त्यांच्यावर आरोप करते तर घरातले सगळेच तिच्यावर ओरडतात मात्र ती सांगते की, आपण प्रत्यक्षात जाऊनच बघूया. त्यानंतर सगळेजण इकडे येतात तेव्हा रूपाली ही अप्पीला दोष देते तर अर्जुन आर्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. घरातील इतर मंडळीही आर्याला समजावतात आणि त्यानंतर आर्या सांगते, मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवायला तयार आहे पण तू इथे एकही क्षण राहायचं नाही.
त्या वेळेला अमोल अप्पीला रडू नको असं सांगतो आणि सांगतो की, माझ्या माँ आणि बाबाची जोडी बेस्ट जोडी आहे. हे ऐकल्यावर तर अर्जुनचा आणखीनच जळफळाट होतो. अर्जुन द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो आणि अखेर त्याने अप्पीच्या प्रेमालाही नकार दिलेला असतो. आता मालिकेत पुढे काय होणार?, अर्जुनला मिळवण्यासाठी अप्पी प्रयत्न सुरूच ठेवणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.