‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांनी प्रेक्षकांना साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत सध्या अप्पी व अर्जुन यांचा दूर जाण्यापासून एकत्र येण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. तर अमोल यांची भेट घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहे. मालिकेत असं पाहायला मिळालं की, वटपौर्णिमेच्या उपवासादिवशी अमोलला अचानक चक्कर येते. त्यावेळेला अर्जुन व अप्पी अमोलला घरी घेऊन येतात, त्यानंतर अमोलला बरं वाटत नसतं आणि अमोलची इच्छा असते की, अर्जुननेही त्याच्याबरोबर राहावं म्हणून तो त्यांच्याकडेच राहतो. (Appi Amchi Collector)
तर इकडे आर्याला हे पटलेलं नसतं की, अर्जुन अप्पी व अमोल बरोबर त्यांच्याकडे राहिलेला आहे. त्यामुळे आर्या खूप त्रागा करते आणि सांगते की, जोपर्यंत तुझा निर्णय होत नाही तोपर्यंत मी काही तुझ्याशी बोलणार नाही. अशा पद्धतीने अर्जुन कात्रीत पकडला जातो. दोन्हीकडून अर्जुनची तारांबळ उडालेली असते. अशातच मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अर्जुनला भेटायला सगळेचजण त्यांच्या घरी आलेले असतात. त्यावेळेला आर्याही तिथे येते.
आर्या अमोलला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. आता तुझ्या बाबांचं दुसरं लग्न होणार आहे त्यामुळे ते तुला व तुझ्या माँला भेटायला येऊ शकत नाहीत किंवा ते तुमच्याबरोबर राहू शकत नाहीत. तसेच असेल तर तू त्यांच्या घरी येऊन राहा, असं आर्या सांगते. हे ऐकल्यावर सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात तर अमोल अर्जुनला बोलतो की, मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काही दिवस आमच्याबरोबरच राहावं. आता अर्जुन काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचच लक्ष लागून राहिलेलं असतं.
त्यावर अर्जुन सांगतो की, मी आता अमोलची इच्छा मोडू शकत नाही. आता मला अमोलच म्हणणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे काही दिवस मी अमोल बरोबरच इकडे राहायचा निर्णय घेतला आहे. यावर अमोल खूप खुश होतो. आता आर्या या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार?,आर्या अर्जुनची बाजू सांभाळून घेईल का?, एकत्र राहिल्यानंतर अर्जुन व अप्पी कायमचे एकत्र येतील का?, हे सगळं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.