बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या मृत्यूमागील गूढ रहस्य अद्याप समोर आलेले नाही. या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाते. ९० च्या दशकातील ही लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती. दिव्या भारतीच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अभिनेत्रीचा शेवटचा चित्रपट ‘लाडला’ येण्याआधीच तिचा मृत्यू झाला. चित्रपट प्रदशनापूर्वीच अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दिव्याने ‘लाडला’ चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण पूर्ण केले होते. मात्र अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने हे चित्रीकरण तिथेच थांबलं. यानंतर अनेकांनी चित्रपट बंद करण्याचा सल्लाही दिला होता. पण निर्मात्यांनी तो चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. (Laadla Shooting Seen)
निर्मात्यांनी या चित्रपटात श्रीदेवीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पुन्हा तिच्याबरोबर चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. श्रीदेवीला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले कारण तिच्या व दिव्या भारतीमध्ये बरेच साम्य होते. दोघीही दिसायला अगदी सारख्याच होत्या. दोघींमध्ये स्पर्धाही रंगलेली पाहायला मिळायची. चित्रपटात श्रीदेवीची एन्ट्री झाल्यानंतर चित्रपटातील अनेक सीन पुन्हा लिहिण्यात आले.
श्रीदेवी या चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर एक भयानक घटना घडली ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले. दिव्या भारती जो डायलॉग बोलताना अडखळायच्या अगदी तोच डायलॉग बोलताना श्रीदेवीही अडखळल्या, हे पाहून तेथे उपस्थित सर्वच अस्वस्थ झाले. कदाचित दिव्या भारतीचा आत्मा इथे भटकत असावा, असे चित्रपटाच्या टीमला वाटले. त्यामुळे सर्वांनी त्या वेळी गायत्री मंत्राचा जप सुरु केला आणि नारळ फोडून सेटची शुद्धी केली.
याविषयी चित्रपटाची दुसरी अभिनेत्री रवीना टंडनने ‘मुंबई मिरर’ला सांगितले की, “पहिल्या शॉटदरम्यान सर्वजण खूप भावुक झाले होते, कारण दिव्याच्या अचानक निधनानंतर तिच्या जागी श्रीदेवी आली होती. दिव्या, शक्ती कपूर आणि मी औरंगाबादमध्ये एक सीन शूट करत होतो, ज्यामध्ये ती आम्हाला कामावरुन काढून टाकते. हा सीन शूट करताना दिव्या वारंवार डायलॉग बोलताना अडकत होती आणि तिला अनेक वेळा रिटेक द्यावा लागला होता. दिव्याच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनंतर श्रीदेवी हा सीन शूट करत होती तेव्हा तिच्याबरोबर असेच घडले. ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्या तिच्या अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडली आणि तिच्या मृत्यू झाला.