पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी रोजी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, या समुद्रावर बांधलेल्या देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन केलं. मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या या पुलामुळे प्रवासादरम्यानचा खूप वेळ वाचतो. या अटल सेतूबदल अनेक मराठीसह अनेक हिंदी कलाकारांच्या पोस्ट पहायला मिळाल्या होत्या. अशातच नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने या पुलावरून प्रवास केला आणि या प्रवासाबद्दलचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
रश्मिकाने मुंबईतील अटल सेतू पुलाचे कौतुक करणारा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. तसेच या पुलाचे आणि तो तयार करणाऱ्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. रश्मिकाच्या या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या एक्स अकाऊंटद्वरे शेअर करत “’मला लोकांचं आयुष्य सुखकर बनवायला आवडतं” असं म्हणत तिचे कौतुक केले. देशाच्या पंतप्रधानांनी अभिनेत्रीचे कौतुक केले असले तर ती सोशल मीडियावर टीकेची धनी झाली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते नाराज झाले असून तिला कमेंट्सद्वारे नकरात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
South India to North India… West India to East India… Connecting people, connecting hearts! 🤍 #MyIndia pic.twitter.com/nma43rN3hM
— Rashmika Mandanna (@iamRashmika) May 16, 2024
आणखी वाचा – अर्जुनच्या वहिनीकडून अप्पीचा अपमान, दोघांमधला कडूपणा अजूनही कायम, अमोल-अर्जुन यांची भेट नक्की कधी होणार?
अशातच आता यावर आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत तिला सुनावलं आहे. आदित्य यांनी ट्वीट करत रश्मिकाच्याचं नाव न घेता असं म्हटलं आहे की, “मी आताच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहिला. ज्यात ती अटल सेतूची जाहिरात करताना दिसत आहे. (त्यासाठी कदाचित तिला पैसे दिले असतील.) जाहिरातीच्या शेवटी ती म्हणते, जागे व्हा आणि विकासाला मत द्या. जे की चांगलेच आहे. कारण याचा अर्थ भाजपला मत देऊ नका. अशा जाहिराती करण्याआधी वस्तुस्थिती तपासून घ्यावी, ही विनंती. कारण यातली काही तथ्ये चुकली आहेत.”
I just saw an actor suddenly make an advertisement (wonder if it’s paid for or not) on the MTHL, branded as Atal Setu by the current regime.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2024
Some facts were missed:
• Atal Setu- MTHL’s 85% work was completed till June 2022, when our govt was toppled. The work happened during…
यापुढे आदित्य यांनी असं म्हटलं आहे की, “अटल सेतूचे ८५% काम हे जून २०२२पर्यंत पूर्ण झालं होतं, जेव्हा आमचं सरकार पाडण्यात आलं. हे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं. भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने २०२२ ते २०२४ पर्यंत उर्वरित १५ टक्के पूर्ण केलं आणि ३ महिने उशिरा उद्घाटन केलं. कारण महत्वाच्या लोकांच्या तारखा मिळत नव्हत्या. मुंबईची प्रगती रोखून धरली”.