७० ते ८० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी स्वतःला सिद्ध केले आहे. रेखा, हेमा मालिनी, जया बच्चन यांमध्ये अजून एक महत्त्वाचे नाव म्हणजे जयाप्रदा. १९७९ साली ‘सरगम’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. तसेच त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, मराठी व बंगाली अशा अनेक भाषांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयामध्ये यश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. तेथेही त्यांना खूप यश प्राप्त झाले. पण सध्या त्या त्यांच्या चित्रपटातील एका किस्स्यामुळे अधिक चर्चेत आल्या आहेत.एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना जयाप्रदा यांनी सेटवरच एका अभिनेत्याच्या कानशीलात लगावली होती.पण त्यांनी असे का केले होते हे जाणून घेऊया. (jayaprada movie incidence )
जयाप्रदा एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबरच एक उत्तम नृत्यांगणादेखील आहेत. त्या अधिक अभिनेते जितेंद्र यांच्याबरोबर भूमिका करत असत. ही जोडी प्रेक्षकांना खूप पसंत होती. ‘सरगम’ या चित्रपटातून त्यांनी पदर्पण केले आणि त्यामुळे त्या रातोरात स्टारही झाल्या. पण याच चित्रपटाच्या सेटवर अशी घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. हा किस्सा स्वतः जयाप्रदा यांनी शेअर केला आहे. त्यावेळी त्या अभिनेता दलिप ताहिलबरोबर एक सीन चित्रित करत होत्या. हा सीन करताना दलिप यांचा संयम सुटला आणि जयाप्रदा यांच्याबरोबर गैरवर्तन करू लागले.
त्यांच्या या वर्तनामुळे जयाप्रदा यांना खूप त्रास झाला. त्या स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवू शकल्या नाहीत त्यामुळे त्यांनी दलिप यांच्या कानशीलात लगावली. या प्रकारानंतर सेटवर एकदम तंग vatavarन एकदम तंग झाले. त्यांना मारलेल्या प्रकाराची चर्चा मात्र खूप दिवस मनोरंजन क्षेत्रात झाली. पण जयाप्रदा यांनी हे सर्व खरं नसल्याचा खुलासा केला. हा सीनचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयाप्रदा २०२२ साली ‘बधाई हो बेटी हुई है’ या हिंदी चित्रपटामध्ये दिसून आल्या होत्या. सध्या त्या अभिनयापेक्षा राजकारणात अधिक सक्रिय असून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहेत.