मराठी मनोरंजनविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. दोघंही गेली अनेक वर्ष या क्षेत्राचा भाग आहे. या जोडीने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. पण ही जोडी गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आली आहे, ती त्यांच्या सोशल मीडियावरील रील्समुळे. अविनाश व ऐश्वर्या हे दोघेही इंस्टाग्रामवर त्यांच्या नृत्याचे व फिटनेसचे अनेक व्हिडीओज शेअर करतात. ज्याची बरीच चर्चा होते. त्यांच्या व्हिडीओजना चाहत्यांचे प्रेम मिळते. मात्र, अलीकडे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. असं असूनही त्यांनी कमेंट्स व व्हिडिओद्वारे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत आल्या आहेत. (Aishwarya Narkar answered to Trollers)
अविनाश व ऐश्वर्या नारकर हे दोघेही झी मराठीच्या विविध मालिकांमध्ये दिसत आहे. अविनाश हे ‘३६ गुणी जोडी’मध्ये, तर ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. नुकतंच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सध्या त्यांच्या रील्सवर होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल परखड मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
यावेळी ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “प्रत्येक माणसाला महत्व असल्याचं मला वाटतं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की, सोशल मीडिया हा एकमेकांकडून चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी वापर केला पाहिजे. ज्यावेळेस मी कोणतीही रील्स पोस्ट करते, त्या पोस्टखालील कॅप्शन्स कोणीही वाचत नाही. जे मला म्हणायचं आहे, ते मी या कॅप्शनमध्ये खूप काही लिहीत असते. पण तुम्ही असे विचार मांडणं, तुमच्या नात्याबद्दल बोलणं किंवा आजकाल जे ट्रोल करतात, त्यांचं नातं किती चांगलं आहे, काय आहेत, हे आपल्याला या पिढीचं माहित आहे. पण इतकी वर्ष आम्ही एकमेकांबरोबर आनंदाने राहतोय. तर या रील्सच्या निमित्ताने आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो.”
हे देखील वाचा – Video : ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला व्हॅनिटी व्हॅनबाहेर श्रेया बुगडेला पाहताच मलायका अरोराने काय केलं पाहा, म्हणाली, “माझ्यासाठी…”
पुढे सर्वांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे असल्याचं बोलताना त्या म्हणाल्या, “जर सोशल मीडियावरील काही गोष्टी तुम्हाला नाही आवडल्या, तर त्या पाहू नका. त्याला अनफॉलो करा. ते मलाही करता येतं, मी त्यांना ब्लॉकदेखील करू शकते. पण मला असं वाटतं की, माणूस म्हणून आपण एकमेकांचा आदर का करू शकत नाही. जर तुम्हाला ते नाही आवडलं, तर आपण चांगल्या शब्दात ते सांगू शकतो. पण तुम्ही त्याच्यात वय आणतात. त्यातही रील्समधून पैसे मिळतात, हा मुद्दा कधीच मला कळत नाही. रील्समधून जर पैसे मिळत असतील. तर ती स्कीम काय आहे हे कृपया मला सांगा.”
हे देखील वाचा – Video : मंचावर माधुरी दीक्षितबरोबर थिरकली ‘नवा गडी नवा राज्य’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “ती आली तिने पाहिलं आणि…”
पुढे त्या म्हणाल्या, “आम्ही कलाकार पैशांसाठी १२-१२ तास काम करतो आणि ते आमचं पॅशन आहे. त्यामुळे त्याच्यासाठी या अन्य गोष्टी करत बसण्याचं काही कारण नाही. तरी आपण इतक्या उथळ विचारांनी नका वागू, एखाद्याला बोलायचं म्हणून बोलू नका, असं मला वाटतं. त्याने आम्हाला किती फरक पडतो किंवा पडत नाही, हा वेगळा मुद्दा. पण आपण एकमेकांचा आदर करणं, हे मला जास्त महत्वाचं वाटतं.”
हे देखील वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ चित्रपटाचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
“मुलांना हे सगळं समजावण्यात त्यांच्या आई-वडिलांचा खूप सहभाग आहे. आपण आपल्या मुलांना कसे संस्कार देतो. आपली मुलं कोणाला काय बोलतात, त्यांच्याशी कसं वागतात, हे सगळं आपल्याला घरातून मिळतात. त्यामुळे असं जे कोणी विकृत बोलतात, त्यांच्या घरातील वातावरणावर मला शंका येते. की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले की नाही, की त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच गेले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. त्यामुळे एक माणूस म्हणून विनंती करते की, आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. कारण माणूस म्हणून आपण जन्माला आलो. प्राणीसुद्धा एकमेकांना छान प्रेमाने वागवतात. मग माणूस म्हणून आपण त्यांच्या वरचढ आहोत. आपल्याला बुद्धी दिली आहे, तर त्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा.”, असं ऐश्वर्या यावेळी म्हणाल्या.