Aarti Solanki Video : आजवर आरतीने तिच्या विनोदी अभिनयशैलीने नाटक, मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र काही कालावधीनंतर आरती सिनेसृष्टीपासून दूर गेली. कारण त्या काळात आरतीला अनेक कठीण प्रसंगांना समोर जावं लागलं. तब्बल ५० किलो वजन कमी करून आरतीने स्वतःला सिद्ध केलं. वजनावरून अपमान करणाऱ्यांची एकप्रकारे आरतीने बोलतीच बंद केली. तर अपमानाला वाचा फोडत आरतीने कायम स्वाभिमान जपला. एका कार्यक्रमादरम्यान झालेला अपमान आणि त्यावेळी आरतीने जपलेल्या स्वाभिमानाबाबत बोलताना आरतीने ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात हजेरी लावली तेव्हा स्पष्ट केलं.
आरती म्हणाली, “त्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनला मला प्रवेश नाही असं सांगितलं होत, पण पाहुनी कलाकार म्हणून मला बोलावलं होत, तेव्हा मला त्या EP चा कॉल आला की, तुला तिसऱ्या सिझनची वाईल्ड कार्ड एंट्री मध्ये स्पर्धक म्हणून बोलावलं आहे. दोन सिझननंतर तिसऱ्या सिझनला महाअंतिम फेरी आहे. तर मला हे कळलंच नाही मध्येच का बोलवलं. यावर मी तिला उलट प्रश्न केला की, असं का मला मध्येच बोलावलं, यावर ती EP म्हणाली, हे बघ तू स्वतःला बच्चन समजू नकोस, तू खूप चांगलं काम करतेय म्हणून तुला घेतलेलं नाही, तुला आम्ही ठेवलय म्हणून तू आहेस, तू फार उत्तम काम करतेय वा तू आम्हाला हवीच आहेस म्हणून तू नाही आहेस. त्यातही मी तुला सांगतेय ते तू कर. तेव्हा माझा गोंधळ उडाला की, चॅनल माझी स्तुती करतंय, ते माझं काम चांगलं नाही आहे म्हणून करतंय की, काम न चांगलं करता मी असं काय करत होते म्हणून मी तिथे होते.”
“मला फार वाईट वाटलं. त्यावेळी मी निर्मात्यांना कॉल केला आणि सांगितलं की असं असं माझ्याबरोबर बोलणं झालं. मी त्यांना हे ही सांगितलं की, मी आता काम करू शकत नाही, आणि तिच्यासमोर तर बिलकुल नाही, कारण ती मला बोलली आहे की, तू काम काही चांगलं नाही करत आहेस. असं बोलल्यावर कोणता कलाकार जाऊन काम करेल. त्यानंतर निर्मात्यांनी मला हेडचा नंबर दिला आणि सांगितलं की तू त्यांच्याशी बोल. त्यानुसार मी माझ्या हेडबरोबर बोलले, त्यांना मी सांगितलं मी खूप अपमान सहन करतेय, आणि आता तर एक अभिनेत्री म्हणून माझ्या कामावर बोललं गेलं आहे. हे मी सांगितल्यावर ते म्हणाले ती फार वाईट बोलली आहे. तू उद्या रिहर्सलला ये. मी बघतो काय करायचं ते. तेव्हा ती EP सुद्धा आली आणि तिने मला सॉरी म्हटलं. यावर मी तिला म्हटलं, तू माझ्याहून वयाने, कर्तृत्वाने खूप मोठी आहेस आणि मलाही माहित आहे मला चॅनल मोठं करतंय, वा मला चॅनेलने ईथपर्यंत आणलंय, आणि एक कलाकार म्हणून त्याच्या कलेला कधी दोष देऊ नकोस, आणि असं कधी कोणाला वागवू नकोस.”
“पुन्हा चौथ्या सिझनला तिचा स्वतःहून कॉल आला, पण मी तेव्हा स्पष्ट नकार दिला. मी चाळीतली मुलगी आहे, मी गरीब आहे हे मला माहित होतं, मी नकार देणं चुकीचं होतं हे ही मला कळत होतं, मी नुकतीच गाडी घेतली होती तेव्हा दहा हजार रुपयाचा हफ्ता होता. पण मी तरी नकार दिला कारण माझ्यासाठी स्वाभिमान खूप महत्वाचा आहे.”