‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. गेली सव्वाचार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत येणाऱ्या वळणांमुळे या मालिकेवर चाहते नाराज असलेले पाहायला मिळाले. मात्र या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने मालिकेचा नवा प्रवास पाहायला मिळत आहे. आशुतोष केळकरच्या मृत्यूची बातमी अनेकांना पटलेली नाही. (Aai Kuthe Kay Karte promo)
चाहत्यांनी आशुतोषच्या मृत्यूनंतर त्याला मिस करत असल्याचं देखील म्हटलं. अशातच मालिकेत आशुतोष व अरुंधतीची लेक मनुची पुन्हा एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. मनू जेव्हा अरुंधतीला भेटायला देशमुखांच्या घरी येते तेव्हा संजना संधी साधून मनुचे कान भरते. संजना मनूला सांगते की, तुझ्या आईमुळे तुझा बाबा देवाघरी गेला. हे ऐकल्यावर मनू अरुंधतीवर रागावून निघून जाते.
मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, मनु अरुंधतीबरोबर राहायचं नाही असं म्हणून सुलेखा ताई व अनिशकडे जायचा हट्ट करते. अरुंधती मनूला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. अरुंधती मनूला सांगते की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझा बाबा माझ्यामुळे सोडून गेला नाही. तू मला सोडून जाऊ नकोस. एकदा माझ्याजवळ येऊन मला मिठी मार असं सांगते. मात्र मनु अरुंधतीच काहीच ऐकत नाही आणि ती निघून जात असते.
मनु निघून जाताना तितक्यात तिथे नितीन येतो. तो मनूला समजावतो. मनूला तो विचारतो की, तुला हे सर्व कोणी सांगितलं. यावर मनू संजनाकडे बोट दाखवते. तेव्हा सगळ्यांनाचं खूप मोठा धक्का बसतो, मनुने संजनाचं सत्य संगळ्यांसमोर आणलेलं असतं. संजना अरुंधतीला धडा शिकवण्यासाठी ही चाल खेळलेली असते. आता घरातल्यांसमोर, अरुंधतीसमोर संजनाचं नाव समोर आलेलं असतं, आता अरुंधती संजनाला काय बोलणार?, घरातले संजनाला काही बोलणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.