प्रेक्षकांच्या आयुष्यातील मनोरंजनाचं एक महत्वाचं साधन म्हणजे विविध वाहिन्यांवर प्रदर्शितकेल्या जाणाऱ्या मालिका. मालिकांच्या या शयर्तीत सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. सध्या मालिकेचा एक प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे आणि या प्रोमोवर प्रेक्षक नाराज असल्याचं देखील पाहायला मिळतंय. अनिरुद्ध बरोबर घटस्फोटानंतर अरुंधती-आशुतोष यांचा संसार सुरु झाला पण तरीही अरुंधती देशमुखांच्या घरापासून लांब गेली नाही. या नंतर मालिकेत अनेक घटना घडल्या पण त्यातील काही घटनांवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. आता पुन्हा एकदा मालिकेचा नवीन प्रोमो ट्रोल होताना दिसतोय.(Aai Kuthe Kay Karte Promo)
मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आशुतोषचं निधन झालं असून “त्याच्या निधनाला अरुंधती कारणीभूत आहे” असं आशुतोषच्या आईचं म्हणणं आहे आणि आशुतोषच्या आईने अरुंधतीला घरातून निघून जाण्यासही सांगितलं आहे. पुढे कांचन आई “मी माझ्या सुनेला नाही मुलीला इथून परत घेऊन जाण्यासाठी आलीये” असं म्हणत अरुंधतीला परत देशमुखांच्या घरी घेऊन जातात.
मालिकेच्या या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत राग व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोवर “एक तरी नाते एकनिष्ठ दाखवायचे , सगळ्यांची दोन लग्न दाखवली आहेत, दोन बायका आणि दोन नवरे आता अजून त्यात काही वेगळे, सामान्य माणूस हे सर्व कार्यक्रम कुटुंबासोबत बघतात त्याचे तरी भान असावे, चांगले संस्कार दाखवले तर बरे होईल’, ‘अरुंधतीचं पुन्हा लग्न होणार का?” अशा कमेंट्स करत आपला राग व्यक्त केला आहे. तर काहींनी “काही दिवसात तिसरा नवरा येतोय म्हणा की… नवा नवरा, नवा प्रवास” अशा कमेंट्स करत मालिकेची खिल्ली उडवली आहे.(Aai Kuthe Kay Karte Promo)
मालिकेत येणाऱ्या या नव्या वळणासह मालिकेच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात आला आहे. आई कुठे काय करते ही मालिका आता दुपारी २.३० वाजता प्रदर्शित होणार असल्याचं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. मालिकेच्या या प्रोमोनुसार अरुंधती पुन्हा देशमुखांच्या घरी जाणार का?, अनिरुद्ध-अरुंधती पुन्हा लग्न करणार?असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. नक्की मालिकेत कोणतं वळण येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.