‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणं येत असतानाच मालिकेत अनिरुद्ध व संजनामुळे कांचनच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं. संजनाच्या सततच्या टोकाच्या बोलण्याने कांचनच्या छातीत दुखू लागत आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात येतं. आप्पांनी या सगळ्याचा दोष अनिरुद्ध व संजनावर लावलेला पाहायला मिळाला. त्यावेळेला संजनाने याचा बदला घ्यायचं ठरवलं आणि अनिरुद्धच्या मनात विष पेरत हे घर आपल्या नावावर करुन घे असं सांगितलेलं असतं. दरम्यान मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, देशमुखांच्या घरी आनंदाचे वातावरण असतं. (Aai Kuthe Kay karte Serial)
सगळेचजण आप्पांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत असतात. आप्पांच्या वाढदिवसासाठी सगळेच कुटुंब एकत्र जमलेले असते मात्र त्यात अनिरुद्ध व संजना नसतात. आप्पांचा वाढदिवस साजरा करणार इतक्यातच अनिरुद्ध व संजना घरात येतात. आणि आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. अनिरुद्ध आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर संजना म्हणते तुम्ही सुद्धा आम्हाला शुभेच्छा द्या. यावर अरुंधती विचारते तुम्हाला कोणत्या शुभेच्छा द्यायच्या आहेत?, तेव्हा संजना सांगते की, आता हे घर अनिरुद्धच्या नावावर झालं आहे. यावर अरुंधतीचा पारा चढतो.
अरुंधती म्हणते की तुम्ही आप्पांना फसवून हे घर तुमच्या नावावर केलं आहे का?. यावर अनिरुद्ध हो असं सांगतो. आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता त्यामुळे मला हे असं करावं लागलं आणि माझा तो हक्क आहे, असंही बोलतो. इतकंच असेल तर तू एका महिन्याच्या आत माझे सगळे पैसे दे. मग मी हे घर खाली करतो असं सांगतो. आता अरुंधती समोर खूप मोठं आव्हान आलेलं असतं. अरुंधतीने न घाबरता देशमुख कुटुंबाच्या भल्यासाठी हे आव्हान स्वीकारते.
अरुंधती म्हणते की, मी तुम्हाला एका महिन्याच्या आत पैसे दिले. तर तुम्हाला हे घर कायमचं सोडावं लागेल आणि या घराच्या आसपासही तुम्ही मला फिरताना दिसता कामा नये. आता अरुंधतीने स्वीकारलेलं एका महिन्याचे हे आव्हान ती पूर्ण करु शकेल का?, अनिरुद्धला ती पैसे देऊ शकेल का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.