Lakshmi Niwas upcoming twist : ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. मालिकेत जान्हवी-जयंतसह भावना-सिद्धूची जोडीही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहे. सध्या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासची मुले एकमेकांशी भांडत आहेत, तर एकीकडे गाडे पाटीलांच्या घरी भावना त्रास देण्यासाठी आजी कारस्थान करत आहे. त्याचबरोबर जयंत जान्हवीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान झी-मराठी वाहिनीने नवा प्रोमो समोर आणला आहे. त्यात सिद्धू आणि भावना नवरात्री उत्सवात गेले आहेत.
सिद्धू व भावना एका ठिकाणी बसलेले असताना, त्याचे मित्र त्याला फिरायला बोलवतात. यावर भावना सिद्धूला विचारते, “कुठे चालात?” सिद्धू उत्तर देतो, “रात्रभर ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात… जसं की पोरे दारू पिऊन दंगा करतात, मुलींची छेडछाड करतात. आम्ही गस्त घालतो आणि त्या सर्व चुकीच्या गोष्टी थांबवतो. त्याचबरोबर रवीही त्या उत्सवाच्या ठिकाणी आला असल्याचं दिसतं. तो मनात म्हणतो, “जसा राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसा भावनाचा सिद्धूमध्ये अडकलेला आहे. आता सिद्धूला पिक्वचरमधून काढलं पाहिजे”.
काही क्षणांनंतर काही लोक सिद्धूला किडनॅप करताना दिसतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की जयंत सचिनला सांगतो, “व्येंकीच अर्जुन आहे, हे मला बरंच नंतर कळलं.” सचिन उत्तर देतो, “अरे, तुझ्यामुळेच अर्जुनचा आवाज गेला. तू त्याला बोअरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतं.” हे ऐकून जयंत शांतच होतो. आणि नेमकं हे बोलणे जान्हवी ऐकते, आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिने जे काही ऐकलं ते नेमकं काय आहे ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते, आणि डोळ्यांत अश्रूही दिसतात.
आणखी वाचा – हॉस्पिटलमध्ये ओळख, १५ वर्षांचं अंतर ते लग्न; सयाजी शिंदेंची हटके लव्हस्टोरी, पहिली भेट…
तर आता खरी उत्सुकता अशी आहे की, जान्हवी कोणता निर्णय घेईल? आणि सिद्धूच्या जीवाचा धोका असलेला प्रसंग कळल्यावर भावना काय करेल? हे पाहणं निश्चितच प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे.





