सध्या सर्वत्र आयपीयलचा थरार सुरू आहे. एकापेक्षा एक अनेक रोमांचकारी सामन्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. असाच एक रोमांचकारी सामना रंगला मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये. नाणेफेक जिंकून मुंबईने बंगळुरूला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या आक्रमी गोलंदाजी समोर बंगळुरूच्या फलंदाजांना जास्त वेळ तग धरता आला नाही. जसप्रीत बुमराहच्या आक्रमक माऱ्याने बंगळुरूचे पाच गाडी बाद करत मुंबईचा विजय सुनिश्चित केला.(Virat Kohli Hardik Pandya Video)
या सामन्यामध्ये विराट कोहली खास कामगिरी करू शकला नाही पण त्याच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. हार्दिक पांड्याने यंदा कर्णधार पदाची धुरा सांभाळली आणि मुंबईच्या चाहत्यांचा राग चांगलाच अनावर झालेला पाहायला मिळाला. रोहित शर्मा सारख्या अनुभवी कर्णधाराला अचानक कर्णधार पद सोडायला लावल्याचा आरोप चाहत्यांनी हार्दिक आणि मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनावर केला. यंदाच्या हंगामात मुंबईला पहिल्या तीन सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे हे सामने मुंबईला गमवावे लागले असे अनेक क्रिकेट तज्ञांचे व चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याचे परिणाम या सामन्यातही दिसून आले हार्दिक फलंदाजीसाठी येताच प्रेक्षकांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. चाहत्यांचा अतिरेक पाहून विराट कोहली ने ” कृपया असं काही करू नका, लहान मुलं आहात का?” असा इशारा प्रेक्षकांना केला आणि वातावरण क्षणात बदललं. हार्दिकला चिडवणारे अचानक त्याला पाठिंबा देऊ लागले. तसेच मुंबईने सामना जिंकल्यानंतर हार्दिक व विराट यांची गळाभेट देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवचा हल्लाबोल
सूर्यकुमारने मागच्या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईच्या संघात आपले स्थान मिळवले. पण पहिल्या सामन्यात सूर्यकुमारला हवी तशी कामगिरी करण्यात यश आले नाही. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात मुबंईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने या सामन्यात तुफानी फलंदाजी करत केवळ १७ चेंडूमध्ये ५२ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.(Virat Kohli Hardik Pandya Video)
बुमराह-ईशान ठरले मुंबईच्या यशाचे शिल्पकार
प्रथम गोलंदाजी करत बंगळुरूच्या संघाला १९६ धावांमध्ये अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यात जसप्रीत बुमराहने मोलाचे योगदान दिले. विराट कोहलीसह अन्य चार फलंदाजांना जसप्रीत बुमराहने बाद करत बाहेरचा रास्ता दाखवला. तर १९६ धावांचा पाठलाग करत असताना ईशान किशनने कमी चेंडूमध्ये तब्बल ७० धावांची खेळी उभारली आणि मुंबईचा वैजय सुनिश्चित केला.