Tharala Tar Mag Not Going Off Air : सध्या मालिकाविश्वातील बहुतेक मालिका नवनवीन सिक्वेन्स आणत प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या जबरदस्त प्रोमोमुळे सर्वत्र विलास मर्डर केसची चर्चा सुरु आहे. केसचा निकाल कधी लागेल? यावर प्रेक्षकही फार उत्सुक आहेत. तर गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विलास मर्डर केसचा आता जुलै महिन्यात अखेर निकाल जाहीर होणार आहे. ज्यामुळे लवकरच मालिका संपेल का?, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहेत. सध्या मालिकेत सायली-अर्जुनला साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा सापडल्याने ते दोघेही प्रचंड आनंदी होतात. पण कोर्टात नवीन ट्विस्ट येतो.
कोर्टात आलेल्या या ट्विस्टमध्ये दामिनी कोर्टासमोर तिची ठाम बाजू मांडते आणि बोलते की अर्जुन फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या या खटल्याचा निकाल लवकर लागला पाहिजे असं म्हणत कोर्टाला उत्स्फूर्त करते. ज्यामुळे कोर्टाकडून अर्जुनला फक्त ३० दिवसांची मुदत जाहीर केली जाते. आणि केसचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असं स्पष्ट म्हटलं जातं. पण लवकरच मालिका संपणार का?अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. आणि या संदभार्त सायलीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने मलिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने मधुभाऊबरोबर पोज देत सेल्फी शेअर केली आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ ! ठरलं तर मग!! विलास खुन खटल्याचे शेवटचे ३० दिवस !! मालिका संपत नाही आहे, पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय ! नक्की बघा ठरलं तर मग !!”, असं लिहीत प्रेक्षकांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
आता या ३० दिवसात अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार? केस कोण जिंकणार? हे पाहणं फारच महत्वाचं ठरणार आहे. जुईने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मालिका संपणार नसल्याने आनंद व्यक्त केला आहे.





