‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, जेलमध्ये महीपत भेटायला आलेल्या साक्षीला अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचे पुरावे मिळवायला लवकरात लवकर स्वतःलाच बाहेर पडावं लागेल असं सांगतो. शिवाय सायलीच अर्जुनच्या आयुष्यात नसेल तर अर्जुन कुठल्याही केसमध्ये येऊ शकत नाही असं सुद्धा महीपत साक्षीला सांगतो. दुसरीकडे अर्जुन, सायली व चैतन्य महीपतच्या घरी साक्षी महीपत विरोधी पुरावे शोधताना तिथे अचानक नेमकी साक्षी येते. तेव्हा चैतन्य-अर्जुन एकमेकांशी वाद घालायचं नाटक करतात आणि सायलीसुद्धा त्यांना समजवायच नाटक करते. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यावेळी साक्षी हे काय सुरु असल्याचं चैतन्यला विचारते. तेव्हा चैतन्य कल्पना मावशीचा लग्न करण्याचा निरोप घेऊन सायली-अर्जुन आले असल्याचं सांगतात. आणि इथे येऊन सल्ले देत असल्याचंही साक्षीला चैतन्य सांगतो. चैतन्य साक्षीला सांगतो, कुणीही सांगूदेत पण आपण लग्न करायला हवं. त्यावर साक्षी मनातल्या मनात तुझ्याशी साखरपुड्याच नाटक अर्जुनला कमकुवत बनवायला आहे नाहीतर तुला दारातही थारा दिला नसता असं म्हणते.
आणखी वाचा – अहिल्यादेवींचा ऍडशूटसाठी होकार, दिशा-दामिनीची नवी चाल, प्रोजेक्ट होईल का पूर्ण?
यानंतर चैतन्य आपल्या खोलीत साक्षीसाठी खास कॅन्डल लाईट डिनरच आयोजन करतो आणि तेव्हा मुद्दाम कारण सांगून साक्षीला तो तिथून आत पाठवतो. या दरम्यान चैतन्य साक्षीच्या ड्रिंकमध्ये झोपेची गोळी टाकतो आणि सेल्फी घेण्यासाठी साक्षीला फोन अनलॉक करायला लावतो. पुढे ती झोपल्यावर तिचा फोन चैतन्य चेक करतो. तेव्हा चैतन्यला हवे असलेले पुरावे सापडतात. तो लगेच स्वतःच्या फोनमध्ये ते पुरावे घेऊन ठेवतो आणि अर्जुनला पुरावे सापडले असून ऑफिसमध्ये भेटण्याचे कळवतो.
एकीकडे नागराजला प्रिया प्रतिमाच्या डेड बॉडीसाठी हॉस्पिटलला यायला तयार करते. दुसरीकडे अर्जुन सायलीला चैतन्यने मिळवलेले सर्व महत्वाचे पुरावे दाखवतो. त्यापुढे अर्जुन-सायली चैतन्यचं तोंड भरुन कौतुक करतात. शिवाय अर्जुन शिवानी जाधव भेटली तर केससाठी आणखी मदत होईल, असं चैतन्यला सांगतो. सायली लगेच शिवानी जाधवच्या घरी जाते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहणार आहोत की, शिवानीला सायली-अर्जुन घरी घेऊन येतात आणि घरच्यांना सायली ही आश्रमातली मैत्रीण असल्याचं सांगते शिवाय आज आपल्याकडेच राहणार असल्याचंसुद्धा ती सांगते.