‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे चैतन्य व अर्जुन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल बोलत असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला सल्ला देतो की, तू आता चिडका बिब्बा म्हणून सायलीबरोबर वाग नाहीतर सायलीला कळेल की तू तिच्या प्रेमात पडला आहेस आणि हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधील क्लाज तू मोडला आहेस तर ती तुला सोडून जाईल. अर्जुनला चैतन्यने दिलेला हा सल्ला मान्य असतो. मात्र त्याला हे कितपत जमेल हे त्याला कळत नाही. तो म्हणतो की, सायली माझ्यासमोर आली की मला सगळं काही विसरायला होतं. सायली समोर मला हे करायला जमेल का मला माहित नाही पण मला हे करावंच लागेल. (tharal tar mag serial update)
त्यानंतर सायली इकडे तिने लिहिलेल्या पत्राची डायरी कुठे ठेवू असा विचार करत असते. तितक्यात तिच्या लक्षात येतं की आज आठ वाजले आहेत तरी अर्जुन अजून घरी आलेला नाही त्यामुळे ती अर्जुनला फोन करते अर्जुन गाडीत बसून विचार करत असतो की, मी सायली समोर जाऊन हे नाटक कसं करू शकतो. सायली सॉरी पण मला हे करावंच लागेल असंही तो मनात म्हणतो. तितक्यात सायलीचा फोन येतो. अर्जुन तो फोन उचलतो आणि रागा रागात म्हणतो की, तुम्ही मला सारखा सारखा फोन का करताय. मी फोन उचलत नाहीये.. याचा अर्थ मी कामातच असणार असाच होतो ना. ऑफिसमध्ये मी काय टाईमपास करायला येतो का?, हे ऐकून सायलीच्या लक्षात येतं की आज अर्जुनचा पारा चढलेला आहे त्यांना फार काम होतं म्हणून त्यांची चिडचिड होते. घरी आल्यावर त्यांना मस्तपैकी एक कॉफी बनवून दिली की त्यांना बरं वाटेल म्हणून ती खाली किचनमध्ये जाते आणि कॉफी बनवू लागते. तेव्हा कल्पनाला कळतं की सायली अर्जुनसाठी कॉफी बनवते तितक्यात अर्जुन येतो तेव्हा सायली पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यासमोर जाते तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो की मी तुमच्याकडे पाणी मागितलं का? मला कॉफी माझ्या रूममध्ये पाठवून द्या. अर्जुन तेव्हा असाही मनात विचार करतो की, इतक्या गोड हसत हसत तुम्ही माझ्यासमोर येऊ नका नाहीतर मला हे करणं शक्य नाही. मात्र मनाशी ठरवून तो चिडून वागतो.
आणखी वाचा – अहिल्यादेवींना मिळाली धमकी, पारूला पडलेलं स्वप्न होणार का सत्य?, मालिकेत येणार नवं वादळ
तर इकडे साक्षी व चैतन्य बोलत असतात तेव्हा साक्षी चैतन्यला विचारते की तू पूर्णा आजीला सायली व अर्जुनच कॉन्टॅक्ट मॅरेज खोटं असल्याचं का सांगितलं यावर चैतन्य विचारतो पण ही गोष्ट तुला कशी कळली तेव्हा साक्षी म्हणते की मला ही गोष्ट तन्वीने सांगितली. तेव्हा चैतन्य तिला विचारतो की, म्हणजे तू आणि तन्वी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहात तर हे तर मला आजच कळतंय. हे रविराज किल्लेदारांना चालतं का? हे ऐकल्यावर साक्षीच्या लक्षात येत की हा विषय कुठेतरी भरकटणार आहे त्याच्यामुळे ती विषय संपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा चैतन्य सांगतो की, पूर्णा आजींचा वय काय आहे त्यांना जर ही गोष्ट कळली असती तर त्यांना हार्ट अटॅक आला असता म्हणून मी त्यांच्यासमोर खोटं बोललो त्यानंतर साक्षी चैतन्यला जाळ्यात अडकवत विचारते की सायली व अर्जुनचं हे कॉन्टॅक्ट मॅरेज आहे तर त्याचे कुठेतरी पुरावे असतील ना यावर चैतन्य म्हणतो की हे माझ्याकडे तर पुरावे काहीच नाहीयेत. अर्जुनकडे असतील तर मला माहित नाही मला तितकसं काही आठवत नाही. ते सायली आणि अर्जुन बघून घेतील आपल्याला काय करायचे यावर साक्षी मनातल्या मनात म्हणते की, याचा मला काहीच उपयोग नाहीये तरीसुद्धा मला याला पोसाव लागत आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की, तू किती शहाणी आहेस आणि सगळं माझ्याकडून काढून घेते हे मला आता कळतंय, आता ही तुझी चाल तुझ्यावर कशी पलटवतो ते बघ.
तर आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळते की, सायली अर्जुनला ती डायरी दाखवत असते तेव्हा अर्जुन तिच्यावर चिडतो आणि डायरी लांब फेकून देतो. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन सायली बोलत असतात तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की, तुम्ही माझ्या घरच्या गोष्टींमध्ये खूप जास्त involve होत आहात असं करू नका याचा त्रास तुम्हालाच त्रास होईल. तेव्हा सायली विचारते कधी होईल यावर अर्जुन उत्तर देतो की, हे कॉन्टॅक्ट मॅरेज संपल्यावर. हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.