‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, कालच्या भागात अहिल्यादेवींना कोणाचातरी फोन येतो आणि त्या त्या फोनवरून अहिल्यादेवीना धमकी दिली जाते. मात्र आजच्या भागात असं पाहायला मिळते की, धमकी देणाऱ्या माणसानं थेट पुष्पगुच्छसहित एक लेटर अहिल्याबाईंच्या बेडरूममध्ये ठेवलेलं असतं त्यामुळे ते वाचल्यानंतर अहिल्यादेवींचा संताप वाढतो. तर इकडे पारू झोपेतून उठून बाहेर येते आणि पाहते तर अहिल्यादेवी तिला आवाज देत असतात आणि त्या खाली बसलेल्या असतात. त्यांच्या डोक्याला जखमा झालेल्या असतात आणि त्या पारूकडे एका आशेने पाहत असतात. इतक्यात पारूला जाग येते तेव्हा पारूच्या लक्षात येतं की हे तिचं स्वप्न होतं आणि पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणून ती खूपच घाबरते तर मारुती तिला समजावत असतो की, ते स्वप्न होतं त्याच्यामुळे तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. अहिल्यादेवी ठीक आहेत. (Paaru Serial Update)
त्यानंतर इकडे ब्रँडच्या प्रमोशनसाठी सगळेजण जायला निघतात तेव्हा पारू सगळ्यांचा निरोप घेत असते तेव्हा ती श्रीकांतला सांगते की गोळ्या वेळेवर घ्या, आणि अहिल्यादेवींची काळजी घ्या. तर अहिल्याबाई आदित्यवर सगळ्यांची जबाबदारी सोपवतात आणि सांगतात की, सगळ्यांना नीट घेऊन जा आणि सगळ्यांवर लक्ष ठेव. त्यानंतर इकडे दिशा अजून आली नाही म्हणून प्रीतम फोन लावायला जातो तेवढ्यात दिशा तिकडून बॅग घेऊन आलेली असते. ते सगळेजण गाडीत बसतात आणि गाडी निघून जाते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी मोहनला सांगतात की सगळ्या सुरक्षारक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना तू माझ्यासमोर तातडीने उभं कर. सगळेजण येतात तेव्हा अहिल्यादेवी विचारतात हा पुष्पगुच्छ माझ्या बंगल्यात आला कसा?, त्यावर सचिन नावाचा एक कर्मचारी असतो तो सांगतो की पांढऱ्या कपड्यात साहेब आलेले त्यांनी हा मला तुम्हाला द्यायला सांगितला मला वाटलं काहीतरी शुभेच्छा असतील म्हणून मी त्या घेऊन आलो. यावर अहिल्यादेवी त्यावर चिडतात मात्र श्रीकांत तिला समजावतो आणि सांगतो की त्याला काही माहीत नसेल आपण हे बघून घेऊ.
त्यानंतर अहिल्यादेवी सर्वांना आदेश देतात की, या बंगल्यात माझ्या परवानगीशिवाय मुंगीसुद्धा आत आली नाही पाहिजे आणि सगळ्यांना जायला सांगतात. तर इकडे प्रमोशनच्या वेळेला सगळेचजण प्रवास करत असतात तेव्हा गाडी एका ठिकाणी थांबून चहा पिण्याचा सगळेजण आनंद घेताना दिसतात. मजा-मस्ती करत ते चहा पीत असतात मात्र दिशाला काही ते आवडत नाही दिशा जाऊन गाडीत बसते तर सगळेजण धमाल करत असतात. त्यानंतर इकडे त्याच वेळेला तो चहावाला त्यांना आधीच सावध करतो की ज्या वाटेवरून तुम्ही जात आहात ती वाट चोरीची वाट आहे त्याच्यामुळे खूप सावधानपूर्वक तुम्ही प्रवास करा. तर इकडे अहिल्याबाई ऑफिसमध्ये असतात तेव्हा माजी मंत्री सूर्यकांत कदम यांचा पीए त्यांना भेटायला आलेला असतो. त्याला तातडीने अहिल्या देवींना भेटायचं असतं म्हणून तो रिसेप्शनवर गोंधळ घालतो तेव्हा मोहन त्याला समजावतो मात्र तो काही ऐकत नाही.
त्यानंतर अहिल्या देवी थेट उठून बाहेर येताना दिसतात. आता अहिल्यादेवी नेमकं काय करणार?, अहिल्यादेवींना आलेली ही धमकी मालिकेत कोणतं रंजक वळण घेणार?, प्रमोशननिमित्त निघालेल्या पारू व आदित्यचा प्रवास सुखकर होणार का?, हे सर्व पाहणे मालिकेत रंजक ठरणार आहे.