‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, आपल्या कुटुंबात खूप जास्त सहभागी न होण्याबाबत अर्जुन सायलीला स्पष्टीकरण देतो. असा हिरीरीने सहभाग घेणं किंवा माझ्यावर खूप जास्त प्रेम करणं हे असं कॉन्ट्रॅक्टनुसार करण्याची काहीही गरज नसल्याचं अर्जुन सायलीला सांगतो. मागे घडून गेलेल्या घडामोडींसाठी भरपूर मदत केली असली तरी ती फक्त माणुसकीच्या नात्याने केली असल्यामुळे अर्जुन सायलीला त्याबद्दल धन्यवाद देतो. पण यानंतर असं काहीही न करण्याच अर्जुन सायलीला सांगतो. पण सायलीला मात्र नीट कळलं नसल्याने “नंतर म्हणजे नेमकं काय?”, असा प्रश्न ती विचारते. त्यावर “हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर”, असं अर्जुन सायलीला जरा स्पष्टच सांगतो. (Tharal Tar Mag Serial Update)
आता आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आलं असून कॅलेंडरवर मार्क करून ठेवायलासुद्धा अर्जुन सायलीला सांगतो. त्यावर सायली आजवर सगळंच मार्क करुन ठेवलं असल्याचं अर्जुनला सांगते. वेळच्यावेळी मार्क केल्याने नंतर कुणालाच भावनिक त्रास होणार नसल्याचं अर्जुन सायलीला सांगतो, त्यावर सायलीसुद्धा लक्षात आलं असून तुम्ही म्हणाल तसंच होईल असं अर्जुनला सांगते. दुसरीकडे तन्वी गोरे बाईंना भेटून ऑफिसमधल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या सर्व फाईल्स गुपचूप आणून द्यायला सांगते. अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्या जगाला कळेल तेव्हा सर्वात आधी आपल्याला आनंद होणार असल्याबद्दल स्वतःशीच समाधान व्यक्त करते.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास
इथे सुभेदाराच्या घरी कुसुम सायलीला भेटायला येते. सायली रडत कुसुमकडे आपलं मन मोकळं करते. जिथे आपला व्यवहारापुरता संबंध आहे तिथे मन गुंतवण्याची चूक झाल्याची सायली कुसुमकडे कबुली देत अर्जुनला लिहिलेलं प्रेमपत्र कुसुमला वाचायला देते. ज्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तो अर्जुन खरंच हिरा असून आपण मात्र त्याच्यावर प्रेम करुन बसल्याचं सायली कुसुमला सांगते आणि आपल्या मनातल्या सर्व भावना कुसुमसमोर बोलून मोकळी होते. दुसरीकडे अर्जुनही सायलीच्या फोटोकडे बघत सायलीला सुभेदारांची सून म्हणून आपल्याला मिरवायचं होतं, पण आता ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याने या परिस्थितीपुढे हतबल होतो. इथे कुसुम सायलीला अर्जुनपासून अंतर ठेवून माझ्या घरी राहिल्यावर त्रास होणार नसल्याचं समजावते. पण सायली मात्र, आपण इथे घरीच राहून अर्जुनपासून अंतर ठेवून राहू आणि तडकाफडकी असं तुझ्याकडे राहिल्यास घरच्यांना संशय येऊ शकतो असं कुसुमला सांगते.
माझं प्रेम माझ्याकडे नाही त्यामुळे तुझ्या मायेची गरज असल्याचं सायली कुसुमला सांगते. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि ‘प्रेम नाही म्हणजे काय’ असं सायलीला विचारते. मधुभाऊंबद्दल सायली बोलत आहे, असं कुसुम कल्पनाला सांगते. अत्यंत हुशारीने ती ही वेळ मारुन नेते. मधुभाऊ इथे नसल्याने आम्हा दोघींना त्यांची खूप आठवण येते, असंही कुसुम कल्पनाला सांगते. त्यावर कल्पना कुसुमला अर्जुन सायलीची काळजी घेईल असं सांगते, शिवाय अर्जुन सायलीच्या प्रेमाची शाश्वतीसुद्धा देते. आपण पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन सायलीला डोळ्यांना काय झालं आहे, तू रडली आहेस का असं विचारतो. तर दुसरीकडे कुसुम अर्जुनकडून ‘सायलीला हे कॉन्ट्रॅक्ट आयुष्यभर काहीही त्रास न देणारं आणि महागात पडणार नाही’, असं वचन मागते.