सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कित्येक अभिनेत्रींना विविध प्रसंगांचा सामना करावा लागतो. कधी काम मिळवण्यासाठी स्ट्रगल तर कधी मिळालेलं काम टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रगल. स्ट्रगल पाचवीला पूजलेलाच. पण या सगळ्या स्ट्रगलमध्ये कुठेतरी गालबोट लागतच. बऱ्याच अभिनेत्रींना कलाक्षेत्रात वावरत असताना अनेक वाईट अनुभव आले. त्याचबरोबरीने इंडस्ट्रीत काम करते म्हणून बाहेर खासगी आयुष्यातही घाणेरड्या प्रसंगाचा सामना करावा लागला. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबर घडलं. सुरवीनने इंडस्ट्रीत तसेच खासगी आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांबाबत खुलेपणाने भाष्य केलं. तिचं बोलणं ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. (Surveen chawla casting couch)
अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्ये उत्तमोत्तम काम करत सुरवीनने प्रेक्षकां्ष उत्तमोत्तम काम करत सुरवनीने च्या मनावर अधिराज्य गाजवलं. यशाच्या शिखरावर पोहोचत असताना तिला स्ट्रगल मात्र चुकला नाही. कष्ट करत असताना फक्त मुलगी म्हणून इंडस्ट्रीकडूनही घाणेरडी वागणूक मिळाली. याचबाबत हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी खूप वेळा कास्टिंग काऊचचाही अनुभव घेतला. मुंबईतील वीरा देसाई भागातील एक घटना तुम्हाला सांगते. एका दिग्दर्शकाबरोबर त्याच्याच ऑफिसमध्ये आमची मीटिंग झाली. तो दिग्दर्शक मला गेटपर्यंत सोडायला आला. माझ्या लग्नानंतरची ही संपूर्ण घटना आहे. मीटिंगमध्ये माझं लग्न झालं आहे, माझ्या नवऱ्याबाबतही आमची चर्चा झाली. जेव्हा तो मला गेटपर्यंत सोडायला आला तेव्हा तो मला किस करण्यासाठी खाली वाकला. मला जबरदस्ती त्याला ढकलावं लागलं”.
आणखी वाचा – सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर…; लस घेऊनही आजार का होतो?
पुढे ती म्हणाली, “मला धक्काच बसला. तू नक्की काय करत आहेस? असं मी त्याला विचारलं. आणि तिथून निघून गेले. इंडस्ट्रीत अजूनही कास्टिंग काऊचचे बरेच प्रकार घडतात. गैर व्यवहारही होतात. मात्र मिळणाऱ्या धमक्या, काम मिळणार नाही या भीतीने कोणीच याविरुद्ध बोलत नाही किंवा तक्रार दाखल करत नाही”. दरम्यान सुरवीनने आणखी एक धक्कादायक प्रकार सांगितला.
सुरवीन म्हणाली, “एक सावळा सरदार पगडी घालून सायकल चालवत होता. त्याने मला त्याच्या जवळ बोलावलं. मी त्याला बघून पुढे चालायला लागली. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो पँटमधून काहीतरी बाहेर काढत होता. त्यानंतर तो एका बाईकवर बसून घाणेरडे चाळे करु लागला. मी लगेचच तिथून पळ काढला. धावतच निघाले. या घटनेवरुनच लक्षात येतं की, कित्येक लहान मुलींनाही अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असेल”. सुरवीनने सत्य घटनांवर भाष्य करत संपूर्ण प्रकार उघकीस आणला.