दाक्षिनात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार व रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे दोघंही पुन्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. २००४ साली दोघंही लग्नबंधनात अडकले होते. पण २०१८ साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. आता दोघांनीही घटस्फोटासाठी चेन्नई येथील कौटुंबिक सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्यांच्या या निर्णयाबद्दल दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नाही. (dhanush and aishwarya divorce )
मिळालेल्या माहितीनुसार धनुषने एक पोस्ट जारी केली होती. तसेच ऐश्वर्यानेदेखील सोशल मिडियावर वेगळे होणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “१८ वर्ष मित्र, जोडपे, पालक व एकमेकांचे साथी म्हणून एकत्र राहिलो. आमचा प्रवास खूप समजूतदारपणाचा होता. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या व मी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे”.
दरम्याने आता धनुष व ऐश्वर्याने कलम १३ब अंतर्गत सहमतीने घटस्फोट घेण्याची याचिका दाखल केली आहे. या दोघांच्याही याचिकेवर न्यायालायात सुनावणी होणार आहे. दोघांनीही २०२२ साली त्यांच्या नात्यातील दुराव्याविषयी सांगितलं होतं. त्यानंतर अनेकदा दोघंही त्यांच्या मुलांच्या शाळेच्या कार्यक्रमाला एकत्रित दिसले होते. त्यांना यात्रा व लिंगा अशी दोन मुलं आहेत.
आणखी वाचा – “किसिंग सीन करताना लाज वाटत नाही कारण…”, स्मिता तांबेचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “इंटिमेट सीन विचित्र किंवा…”
त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर दोघं आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देतील असे सर्वांना वाटले होते. मात्र आता दोघांनीही आपले नातं पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या ही मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तो याआधी ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटामध्ये दिसला होता. तसेच दिग्दर्शक असलेल्या ऐश्वर्याने ‘लाल सलाम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. दरम्यान दोघांच्या घटस्फोटाबद्दल पुढे काय होणार आहे याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.