Emraan hashmi son cancer : दोन दशकांच्या कारकिर्दीत इमरान हाश्मीने लव्हर बॉय ते खलनायक ते गंभीर नायकापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याने पडद्यावर साकारलेल्या भूमिकांमुळे त्याला चांगली तयारी करण्याची संधी मिळाली, परंतु वास्तविक जीवनात पडद्यामागे जे घडले त्यासाठी तो पूर्णपणे तयार नव्हता. २०१४ मध्ये एका दुपारी त्याला धक्का बसला. अलीकडेच एका मुलाखतीत इमरान हाश्मीने त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षणाबद्दल सांगितले जेव्हा त्याला कळले की त्याचा धाकटा मुलगा अयान याला कर्करोग आहे. तो क्षण आजही त्याला सतावतो.
इम्रान हाश्मीने त्याच्या आयुष्यातील सर्वात हृदयद्रावक क्षणांपैकी एकाबद्दल खुलासा केला, ज्या दिवशी त्याचे जग कायमचे बदलले. एक साधी दुपार अचानक पालकांच्या सर्वात वाईट स्वप्नात कशी बदलली ते त्याला आठवले. रणवीर अल्लाबदियासोबतच्या संभाषणात इम्रानने सांगितले की, “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा तो होता जेव्हा माझा मुलगा २०१४ मध्ये आजारी पडला होता. आणि तो काळ मी शब्दात वर्णनही करु शकत नाही. असे ५ वर्षे चालले. एका दुपारी माझे आयुष्य बदलले”.
आणखी वाचा – “आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं”, अजित दादांच्या चितेजवळ डोकं ठेऊन रडला सूरज; म्हणाला, “मला सोडून…”
अभिनेता म्हणाला, “१३ जानेवारीला आम्ही ब्रंचसाठी गेलो होतो. आम्ही माझ्या मुलासोबत पिझ्झा खात होतो. पहिले लक्षण त्याच टेबलावर आले. त्याच्या लघवीत रक्त होते. पुढच्या ३ तासात आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या मुलाला कॅन्सर आहे. तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करावे लागेल. आणि मग तुम्हाला केमोथेरपी करावी लागेल. त्यामुळे माझे सारे जग १२ तासांतच उलटले”.
इमरान हाश्मीने सांगितले की, “तो काळ आणखी कठीण बनवणारा होता तो म्हणजे आयुष्य पुन्हा सामान्य वाटू लागले. सर्व काही स्थिर आणि चांगले दिसत होते, परंतु अचानक सर्वकाही बदलले”. तो म्हणाला, “तुम्ही म्हणू शकता की आयुष्याचा सुवर्णकाळ आला आहे. आणि आता मला ते सापडल्यासारखं वाटत होतं. मी माझ्या आयुष्याचा ताबा घेतला आहे. मग अचानक तुम्हाला जोरदार धक्का बसतो. आणि भलतंच घडतं”.
आणखी वाचा – न्यायालयानं समीर वानखेडेंची याचिका फेटाळली; आर्यन खानविरोधात केला होता मानहानीचा दावा, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्याची पुढील पाच वर्षे रुग्णालयात जाणं, उपचार आणि सतत काळजीने भरलेली होती. इमरानने सांगितले की, त्या पाच वर्षात त्याला खरोखर काय महत्त्वाचे आहे ते शिकवले. या अनुभवाने त्याला अशाच परिस्थितीतून जात असलेल्या पालकांच्या मदतीसाठी एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली. आता त्याचा मुलगा निरोगी आणि बरा आहे, इम्रान हा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा मानतो.




