‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक हा सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो. आपल्या स्पष्ट, बेधडक व परखड वक्तव्यांसाठी ओळखला जाणारा हा अभिनेता सोशल मीडियाचा वापर फोटो-रील शेअर करण्यासाठीच नव्हे तर अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठीदेखील करतो. त्याने अनेक सामाजिक किंवा राजकीय मतांवर याआधी अनेकदा त्याच्या भूमिका मांडल्या असून त्या भूमिका अनेकदा चर्चेतही आल्या आहेत.
अशातच त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत गोरेगाव फिल्मसिटी या परीसारताईल कचराकुंडीच्या प्रश्नाबद्दल भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये शशांकने असं म्हटलं आहे की, “फिल्मसिटीपासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतेची ही अवस्था आहे. परदेशातून लोक फिल्मसिटी बघायला येतील. तेव्हा हे सगळं दाखवायचं आहे का त्यांना?”
यापुढे त्याने त्याच्या टी-शर्टवर लिहिलेलं वाक्य वाचून दाखवत असं म्हणतो की, “काठावरचा इंजिनीअर ही शहर व्यवस्था करणाऱ्यांची खरी अवस्था आहे. शहरातल्या कचरा व्यवस्थापण करणाऱ्यांची आहे. मुंबईतील आयकॉनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात जिथे सर्वजण फिल्मसिटी बघायला येतात, तिथे जर कचऱ्याची अशी अवस्था असेल तर यात महानगरपालिकेची चूक आहे, कचरा व्यवस्थापन करणाऱ्यांची चूक आहे? की कुणाचीच चूक नसून आपणच कोडगे झालो आहोत” असा प्रश्न आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर फिरायला गेल्यावर मुग्धा-प्रथमेश यांचे देवदर्शन, महादेवाच्या मंदिरातही गेले, फोटो व्हायरल
तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शशांकने “मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाही” असं म्हणत त्याने “मुंबईची फिल्मसिटी बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची आहे? ही अवस्था, हे चित्र काही आजचं नाही. मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाही. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून महानगरपालिकेच्या ऑफिसच्याअ दारासमोर ओतला तर आवडेल का? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरीक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे?” असे अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.