‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने इंद्राणीकडून अस्तिकट्यार मिळवण्यासाठी शेखरचे प्रतिबिंब तयार केलं होतं. प्रतिबिंब शक्तीप्रमाणे शेखरचे प्रतिबिंब इंद्राणीच्या खोलीत जातं आणि इंद्राणीकडे अस्तिकट्यार मागतात. मी ती कट्यार कुठेतरी लपवून ठेवेन असं म्हणत शेखर कट्यार घेतो. मात्र देवीआईच्या कृपेमुळे शेखरच्या प्रतिबिंबाला ती कट्यार पेलवत नाही. त्यामुळे ती कट्यार शेखरच्या अंगावर पडते.
त्यानंतर अद्वैत, नेत्रा व इंद्राणी शेखरला उचलतात. त्यानंतर शेखर पुन्हा अद्वैतकडून ती कट्यार हिसकावून घेतो. तेव्हाही शेखरला ती कट्यार पेलवत नसते. इतक्यात ते प्रतिबिंब नष्ट होईल या भीतीने रुपाली इंद्राणीच्या खोलीवर येते आणि दरवाजा ठोकते. तेव्हा इंद्राणी ती कट्यार पुन्हा लपवते. त्यानंतर रुपाली शेखरला कुणाचा तरी महत्त्वाचा फोन येत आहे असं म्हणून त्याला तिथून लगेच घेऊन जाते. तिच्या या वागण्याचा संशय येऊन इंद्राणी रुपालीच्या मागे मागे जाते.
शेखर रुपालीला अस्तिकट्यारबद्दल सांगणार इतक्यात वेळ झाली असल्यामुळे शेखरचे प्रतिबिंब नाहीसे होते आणि प्रतिबिंब नाहीसे झाल्यानंतर इंद्राणी तिथे येते. तिच्या मागोमाग अद्वैत-नेत्रादेखील येतात. ते इंद्राणीला शेखरबद्दल विचारतात. मात्र शेखर अचानक कुठे नाहीसे झाले हे इंद्राणीलादेखील माहिती नसल्याने ते धावत धावत रुपालीच्या खोलीत जातात. तेव्हा रुपाली तिच्या खोलीत यांना येऊ न देण्याचा प्रयत्न करतात. तरीही नेत्रा, अद्वैत व इंद्राणी शेखरच्या खोलीत जातातच.
आणखी वाचा – वृषभ, मिथुन व धनु राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस आहे खास, सुप्त इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या…
नेत्रा, अद्वैत व इंद्राणी रुपालीच्या खोलीत शिरल्यानंतर शेखर झोपलेले असतात हे ते बघतात. त्यानंतर ते तिघे त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. तेव्हा अद्वैत त्यांना कुणाचाच कॉल आला नसल्याचंदेखील तपासतो. तेव्हा इंद्राणी रुपालीला तू त्यांना काय केलं आहेस असं म्हणत जाब विचारते. मात्र रुपाली मी त्यांना काहीच केलं नसून ते आले आणि झोपले असं म्हणते. पुढे शेखर काहीच हालचाल करत नसल्यामुळे अद्वैत, नेत्रा व इंद्राणी शेखरला दुसऱ्या खोलीत घेऊन जातात.
त्यानंतर इंद्राणी शेखर कोणत्या तरी ग्लानीत असल्याचे म्हणतात. यानंतर नेत्रा व इंद्राणी घेडलेल्या सर्व प्रकाराबद्दल विचार करु लागतात तेव्हा त्यांना रुपालीच्या प्रतिबिंब शक्तीबद्दल माहीत होतं. आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना या विरोचकाच्या प्रतिबिंबांनी केल्याचे त्यांना समजते.
त्यामुळे आता रुपालीच्या या नवीन शक्तीबद्दल माहिती झाल्यानंतर देवीआईच्या लेकींचे पुढचे पाऊल काय असणार? त्या शक्तीविरुद्ध त्या कोणती नवीन चाल खेळणार? आणि या सर्वात नेत्रा तिच्या बाळासह राजाध्यक्ष कुटुंबियांना कसं सावरणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.