‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणाऱ्या सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगोळीने आजवर आपल्या काव्य रचनेद्वारे अनेकांच्या हृदयाला पाझर फोडला आहे, तर अनेकांना प्रेमाच्या दुनियेची जादुई सफर कारूवून आणली आहे. त्यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे अनेक चाहते-मंडळी आहेत.
सलील व संदीप यांची ‘आयुष्यावर बोलू काही’मधील काव्य-सूरांची मैफील आजही रसिकांनी भुरळ घालतेच. हा कार्यक्रम न पाहणारे अगदी विरळच असतील. या लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात असंख्य चाहते आहेत आणि प्रत्येकाच्या याव कार्यक्रमातील गाण्याविषयीचा काहीना काही किस्सा हा नक्कीच आहे. असाच एक भावनिक करणारा प्रसंग सांडेप यांनी सांगितला आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप यांनी हा प्रसंग सांगितला आहे.
‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाविषयी आजोबांनी संदीप खरे यांना दहा रुपये देत त्या गाण्याविषयीची एक आठवण संदीप यांनी सांगितली आहे आणि हीच आठवण संदीप यांनी या मुलाखतीत सांगितली. यावेळी ते असं म्हणाले की, “एकदा मध्यांतरात एक आजोबा आले आणि त्यांनी मला दहा रुपये दिले आणि म्हणाले बाळा, हे गाणं छान लिहिलं आहेस. हे दहा रुपये घे. खाऊला ठेव तुला. मी हे पैसे तुला का दिले आहेत? हे मी तुला नंतर सांगतो.
यापुढे संदीप असं म्हणाले की, “त्या आजोबांनी ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा ते म्हणाले, “२-३ वर्षांपूर्वी माझी बायको गेली आणि तेव्हापासूनच मी रडलो नव्हतो. जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा गच्चीवर जाऊन खूप रडलो होतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, “मला माहिती आहे मी आता काय मिस करत आहे. मला ते जाणवत होतं, पण सांगता येत नव्हतं.”