स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने मराठी टीव्हीविश्वात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलंय. दीपा आणि कार्तिकची ही अनोखी लव्हस्टोरी, शिवाय रंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा महत्वाचा विषय घेतल्याने ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी ठरली आणि टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. मुख्य पात्र दीपा व कार्तिकसोबत सौंदर्या आणि मालिकेतील अन्य पात्रांचेही चाहते फॅन बनले गेले. (rang maza vegla)
‘रंग माझा वेगळा’ ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून सुरु असून मालिकेमध्ये बरेच ट्वीस्ट आले होते. शिवाय मालिकेने तब्बल १४ वर्षांचा लीप घेताना पाहायला मिळाला होता. छोट्या पडद्यावरील ही लाडकी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार का ? अशी चर्चा सध्या सुरु असून या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. (rang maza vegla goes off-air ?)
असा असेल मालिकेचा शेवट ? प्रोमो समोर (rang maza vegla goes off-air ? promo out)
नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात आयेशा कार्तिकला कुंकू लावण्यासाठी विचारते. तेव्हा सौंदर्या येते आणि कार्तिकला तसे करण्यास थांबवते. त्यावर आयेशा “कार्तिक माझा नवरा आहे. मग जर त्याने कुंकू लावलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?”, असा सौंदर्याला सांगते. त्यावर सौंदर्या ते कुंकवाचं भांडं उडवते आणि ज्यातील कुंकू दीपाच्या कपाळाला लागते. असंही म्हटलं जातंय की, मालिकेच्या शेवटी आयेशाची स्मृती परत येऊन ती सर्वांसमोर तिने केलेल्या चुका मान्य करणार आहे. आणि कार्तिक आणि दीपाचा सुखी संसार पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचं दाखवत मालिकेचा शेवट गोड करणार आहे.
मालिकेने आजवर अनेक बदल व लीप घेतले आहे. मात्र मालिकेच्या १४ वर्षांच्या लीपनंतर दीपा आणि कार्तिकच्या नात्यामध्ये झालेल्या बदलामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. प्रेक्षकांची ही नाराजी घालवण्यासाठी निर्मात्यांनी अनेक ट्वीस्ट आणण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याने अखेर ही मालिका संपणार असल्याचे बोलले जात आहे. (rang maza vegla goes off-air ?)
हे देखील वाचा : स्टार प्रवाहची नक्की कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
कारण, या मालिकेच्या जागी ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान, शुभांगी गोखले आणि अभिनेता राज हंचनाळे दिसणार आहे.