Mirza Rafi Ahmed Baig Passes Away : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमरावती येथे त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरु होते. अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी सहा हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर २० काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल महाराष्ट्रभरात अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
आणखी वाचा – धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला हेमा मालिनी आणि दोन्ही मुली नव्हत्या; सनी व बॉबी देओल झाले भावुक
डॉ. मिर्झा यांचा जन्म 17 सप्टेंबर 1957 रोजी झाला. शेती, माती, ग्रामीण भाग, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विसंगती, सामाजिक समस्यांवरील विनोदी शैलीतील लेखन त्यांच्या लोकप्रियतेचे केंद्रबिंदू ठरले. मराठी, वन्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते.





