हिंदी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करणवीर मेहरा व निधी सेठ यांनी २०२१ मध्ये लगीनगाठ बांधली होती. मात्र, आता अवघ्या दोन वर्षातच या जोडीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी सध्या पद्धतीने या जोडीचा विवाह सोहळा पार पडला होता. तसेच, अभिनेत्याचं हे दुसरं लग्न असून ते लग्न देखील काही काळ टिकलं होतं, हे विशेष. (Karanveer Mehra and Nidhi Seth divorce)
समोर आलेल्या वृत्तानुसार, जानेवारी २०२१ मध्ये करणवीर आणि निधी यांनी मोजकेच कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत एका गुरुद्वारात हा विवाह सोहळा पार पडला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. ज्यामुळे दोघांनी अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यावर करणवीरने मौन बाळगलं असलं, तरी निधी सेठने घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हे देखील वाचा – “तू भाजपामध्येच जा”, नागपूरमधील नितीन गडकरींच्या घरी पोहोचली प्राजक्ता माळी, राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी वाढल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट
यावेळी ‘ई-टाइम्स’शी बोलताना निधी म्हणाली की, “गेल्या एक वर्षांपासून आम्ही दोघे वेगळे राहत असून तीन महिन्यांपूर्वी आमचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, कोणत्याही नात्यात विषारीपणा राहता कामा नये. मानसिक शांतता, आर्थिक स्थिती आणि एकमेकांप्रती आदर असणे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्यापूर्वी आपण त्याच्याशी निगडित गोष्टींचा देखील विचार केला पाहिजे.” करणवीर सध्या ‘बाते कुछ अनकहीं सी’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर निधी ही बंगळुरू येथे शिफ्ट झाली आहे.
हे देखील वाचा – Video : ‘जीभ वापरून बाण …’, रावण दहनाला गेलेल्या कंगन राणौतकडून घडली चूक, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
विशेष म्हणजे, करणवीरचं हे दुसरं लग्न होतं. पण हे लग्नदेखील अवघे दोनच वर्ष टिकलं. अभिनेत्याचं पहिलं लग्न त्याच्या बालपणीची मैत्रीण देविका मेहरा हिच्याशी २००९ मध्ये झालं होतं. मात्र काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद झाले, आणि त्यानंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.
निधी सेठदेखील टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘किस्मत का खेल’ आणि ‘श्रीमद् भागवत महापुराण’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री इंटिरिअर डिझायनरचे शिक्षण घेत असून ती तिच्या कुटुंबियांसह आनंदाचे क्षण घालवत आहे. “सध्या मी माझ्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. पण, अभिनय हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा मला अभिनय क्षेत्रात पुन्हा येण्याचं इच्छा होईल. तेव्हा मी नक्की मुंबईत येईन.”, असं ती यावर बोलताना म्हणाली.