paaru serial Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. मालिकेत आलेल्या आजवरच्या प्रत्येक ट्विस्टने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं. पारू आणि आदित्यच्या जोडीला प्रेक्षकांनाही अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सध्या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत आदित्यची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करांची थोरली सून आणण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशातच आदित्य लवकरच लग्नबंधनात आहे. अहिल्यादेवींनी आदित्यसाठी बायकोची निवड केली आहे. आणि अखेर साखरपुड्याचा तो दिवस आला आहे.
आदित्य साजिरीच्या हातात अंगठी घालतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. यावेळी साखरपुड्याच्या मंडपात सयाजी म्हणजेच अहिल्यादेवीच्या भावाची एंट्री होते. ते आदित्यला साजिरीच्या हातात अंगठी घालण्यापासून रोखतात. तुझ्या मनात नेमकं काय आहे हे सत्य तू अहिल्याला सांगितलं पाहिजे असं म्हणते ते आदित्यला सावध करतात. हीच योग्य वेळ आहे असा सल्ला सयाजी त्याला देतात. यानंतर बावरलेला आदित्य कसालाही विचार न करता पारूचा हात धरतो आणि दोघंही अहिल्यासमोर उभे राहतात.
आणखी वाचा – गावाकडे रमलीय अश्विनी महांगडे, चुलीवर भाकऱ्या थापतानाही दिसली आणि…; साधेपणाचं होतंय कौतुक
आदित्य आणि पारूला समोर पाहून अहिल्यालाही मोठा धक्का बसतो. आदित्य मन घट्ट करुन म्हणतो, “आई माझं पारूवर प्रेम आहे. आमचं लग्न झालंय”. पारू गेली कित्येक महिने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालत असते. ते सुद्धा ती अहिल्याला दाखवते. हे सगळं पाहून अहिल्या प्रचंड संतापते. आणि म्हणते, “आदित्य…! या अहिल्यादेवीच्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरीही नाही”. अहिल्याच्या रौद्ररुपाचा आता अंत होतो.
ती आदित्यच्या कॉलरला पकडून त्याला घराबाहेर काढते, तर आदित्य पारूचा हात धरून दोघेही बाहेर येतात. आता अहिल्यादेवीचा सामना पारू आणि आदित्यला करावा लागणार आहे. अहिल्याने बाहेर काढल्यानंतर आता पारू व आदित्य कुठे राहणार?, त्यांचं प्रेम अहिल्याचे मन जिंकणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.





