‘पारू’ या मालिकेत पारूच्या मागे कोणती ना कोणती संकट उभी राहताना पाहायला मिळतात. मालिकेत ब्रँड अँबेसिडरसाठी पारूची निवड झाल्यानंतर अखेर तिचा फोटो बॅनरवर लागलेला पाहायला मिळाला. आदित्यने मारुती, पारू आणि गणीला पारूचा बॅनरवर लागलेला फोटो दाखवला त्यामुळे ते तिघही खूपच आनंदी झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर घरी आल्यानंतर वैजूला नेलं नाही म्हणून ती रागावली असेल असं म्हणत पारू व गणी वैजूची समजूत काढतात. त्यानंतर पारू वैजूला बाहेर बांधून ठेवते आणि ते सर्व झोपायला जातात. तर इकडे आदित्य घरी येतो, त्यावेळेला अहिल्यादेवी, तिचा नवरा आणि मोहन बोलत असतात. (Paaru Serial Update)
मोहनला अहिल्यादेवींनी एक जबाबदारी सोपवलेली असते ती म्हणजेच हरिश बद्दल माहिती काढायची. पारूला साजेसा असा मुलगा म्हणून त्या हरिश कडे पाहत असतात. तर इकडे मोहनने त्याची अगदी शाळेपासूनची माहिती काढलेली असते ते मागील कंपनीत तो कुठे काम करत होता, तिथे त्याचा रेकॉर्ड काय आहे, त्यावर क्रिमिनल रेकॉर्ड तर नाही ना याचे सगळे अपडेट तो अहिल्यादेवींना देत असतो. हे ऐकल्यानंतर अहिल्यादेवींची खात्री पटते की पारूसाठी हरीश हा मुलगाच योग्य आहे. यानंतर उद्या लगेच ही गोष्ट त्या मारुतीला विश्वासात घेऊन सांगायच ठरवतात. तितक्यात तिथे आदित्य येतो, तेव्हा आदित्य म्हणतो एवढ्या रात्री तुम्ही कसली चर्चा करत आहात. तेव्हा अहिल्या देवी सांगतात की, मी पारुसाठी मुलगा शोधला आहे. आणि आम्ही हरिशचा पारूसाठी विचार करत आहोत. हे ऐकल्यावर आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.
तर इकडे रात्रीची वेळ साधत दिशा व दामिनी पारूच्या घराजवळ जातात आणि त्या वैजूला उचलून घेऊन बंगल्या बाहेर येऊन एका माणसाला देतात. मटन विक्रेता असलेल्या त्या माणसाला फुकट बकरी पण मिळते आणि यावर दिशा काही पैसे देखील देते. आणि ती बकरी पुन्हा दिसता नये असंही त्या माणसाला त्या सांगतात. बकरीला गायब करून दिशा व दामिनी खूपच खुश असतात. तर इकडे सकाळ झाल्यानंतर पारू वैजूला शोधत असते मात्र तिला ती कुठे सापडत नाही त्यानंतर सगळेचजण बंगल्यात वैजूला शोधत असतात. त्यानंतर पारू कॉफी देण्याचे निमित्त साधत आदित्यच्या खोलीत जाते आणि आदित्यला सांगते की, वैजू सापडत नाही आहे, वैजू कुठेतरी गेली आहे, हे ऐकल्यावर आदित्य आणि प्रीतम देखील घाबरतात यावर पारू म्हणते की, देवी आईंनी तर वैजूला पाहिलं नसेल ना?, यावर आदित्य तिची समजूत काढत नाही असं म्हणतो.
तर हा सगळा गोंधळ दामिनी पाहत असते आणि ती दिशाला फोन करुन सांगते, आता मालिकेच्या येणाऱ्या भागात अहिल्यादेवी मारुतीला पारूच्या लग्नाबद्दल सांगणार का?, पारुला मुलगा शोधल्याच सांगत त्या लग्नाच्या तयारीला लागणार का?, की पारूची इकडे हरवलेली वैजू भेटणार?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.