‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, पारूच्या डोक्यात आलेली केळवणाची आयडिया सगळ्यांनाच पटलेली असते तर प्रीतम इकडे केळवणाची तयारी सुरु करायला गावाकडून आलेल्या शिक्षिकेला थांबवून घेतो. अहिल्यादेवी समोर सगळेच नोकर माणसं येतात त्यांना एकत्र पाहून अहिल्यादेवी म्हणतात तुम्ही आज सगळे एकत्र कसे आहात यावर सावित्री सांगते की, आम्हाला पारूचं केळवण करायचं होतं मात्र घरातली आताची परिस्थिती पाहता पारूने या गोष्टीला साफ नकार दिला आहे. तुम्हाला काय वाटेल, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून तिने हे करायला नकार दिला आहे असं म्हणतात. (Paaru Serial Update)
अहिल्यादेवी म्हणतात मी का नाही म्हणेन पारुचं केळवण हे व्हायलाच हवं आणि ते आपल्याच बंगल्यात व्हायला हवं असं म्हणत त्या ऑर्डर सोडतात आणि तयारीला लागा असं सांगतात. त्यानंतर त्या शिक्षिका पारूच्या केळवणाची जय्यत तयारी करत असतात. सगळी सजावट्या एकटीने करतात तेव्हा प्रीतम त्यांच्यावर खूप खुश होतो आणि त्यांच्यासह गप्पा मारू लागतो. तर दामिनी आणि दिशाला तिला काम करताना पाहून फारच वाईट वाटतं. त्या तिच्यावरही जळू लागतात. दिशा तिच्याकडे पाण्याच्या ग्लास ही पाठवून देते. तर इकडे आदित्यने आई जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं सांगितलेलं असतं त्यामुळे पारूवर एक मोठं दडपणच असतं. पारूने केळवणाचा घाट घालत अहिल्यादेवीना जेवायला लावायचं असतं याचा ती विचार करत असते.
तर अहिल्यादेवी इकडे किचनमध्ये स्वतः पारूच्या केळवणाची तयारी करायला येतात. त्यांना स्वतः जेवण करताना पाहून प्रीतमही खूप खुश होतो. त्यानंतर अहिल्यादेवी पारूला बोलावून घ्यायला सांगतात. पारू व हरीश केळवणासाठी तयार होऊन येतात तेव्हा अहिल्यादेवी त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण वाढतात. औक्षण झाल्यानंतर अहिल्यादेवी पारूला सोन्याच्या बांगड्या देखील देतात आणि हरीशला श्रीकांत गिफ्ट देतो. तर हे पाहून दामिनीला फारच राग येतो. दामिनी जेव्हा औक्षण करते तेव्हा ती मात्र काहीच देत नाही तर दिशा औक्षण करते तेव्हा ती स्वतःच्या हातातलं ब्रेसलेट काढून पारूच्या हातात देते आणि मनातल्या मनात म्हणते की, मला हे ब्रेसलेट द्यावेच लागेल नाहीतर सासू मॉमला माझ्याबद्दल गैरसमज होईल असं म्हणून दिखावा करण्यासाठी ते सगळं करते. त्यानंतर इकडे पारुला जेवण वाढल्यानंतर पारू जेवायला सुरुवात न करता म्हणते की आधी आपण देवाला नैवेद्य देतो आणि तो नैवेद्य सगळेजण वाटून खातो यावर अहिल्यादेवी म्हणतात तुला जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल.
तेव्हा पारू म्हणते की माझी देवी आई गेले दोन दिवस जेवली नाही आणि मी केळवणाचे जेवण जेऊ का? यावर अहिल्यादेवी तिला ओरडतात आणि सांगतात की, मला शब्दात अडकवू नकोस तो माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि इथे देव वगैरे काही नाही, असं म्हणत त्या रागावतात. आता मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पारू अहिल्यादेवींना जेवायला भाग पाडणार का हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.