‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू मारुतीला जबरदस्ती बंगल्यात पाठवते आणि सांगते की, तू देवी आईला जाऊन लग्नाला माझा नकार असल्याचे सांगून ये. त्यानंतर मारुती अहिल्यादेवीसमोर समोर येतो तेव्हा तो आधी बोलायला घाबरतो. मात्र श्रीकांत त्याला जे असेल ते बोलायला सांगतो. तेव्हा मारुती सगळं काही देवी आई समोर बोलतो. पारू आत्ताच एका कठीण प्रसंगाला सामोरी गेली आहे, त्यामुळे आता ती काही लग्नाला तयार नाही त्याच्यामुळे मी काय तिला समजावू शकलो नाही. यावर अहिल्यादेवी शांतपणे, नम्रपणे सांगतात की, काही हरकत नाही जेव्हा पारूची इच्छा असेल तेव्हा आपण तिच्यासाठी मुलगा शोधू आणि तिचं लग्न करू. (Paaru Serial update)
यावर मारुती खूपच खुश होतो तर त्याच वेळेला आदित्य अहिल्यादेवींना सांगतो की, आपल्याला ब्रँडच्या कामानिमित्त गावोगावी जाऊन प्रमोशन कराव लागेल. त्यासाठी पारू सुद्धा तिथे लागेल यावर अहिल्यादेवी हो म्हणतात आणि प्रीतम व दिशाला सुद्धा बरोबर घेऊन जा असं सांगतात. पारूच्या लग्नाची जबाबदारी अहिल्यादेवी आदित्यला देतात. तेव्हा मारुतीला ते सांगतात की, पारूला कंपनीच्या कामानिमित्त दोन-तीन दिवस बाहेर जावं लागेल. यावर तो होकार देतो आणि तिथून निघून जात पारूला सांगतो की, देवी आईंना मी तुला इतक्यात लग्न करायचं नाही असं सांगितलं आहे. आणि त्यावर त्या पारूच्या मनासारखं होऊदे असं बोलल्या आहेत. तुला कंपनीच्या कामानिमित्त दोन-तीन दिवस बाहेर जावं लागणार आहे तेव्हा ती म्हणते की, मी गणीला सुद्धा घेऊन जाणार. त्यानंतर इकडे दामिनी मोहनला सांगत असते की, तुम्हाला काहीच वाटत नाही का मी इथे मोलकरीण म्हणून काम करत आहे. यावर मोहन म्हणतो की, ही तुझ्या पापाची शिक्षा आहे. त्याच्यामुळे ही शिक्षा तुला भोगावीच लागेल.
सगळेजण जेवत असतात तेव्हा दामिनी धावत येते आणि डायनिंग टेबलवर जेवायला बसते. त्यावर सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. नंतर तिच्या लक्षात येतं की, आपण तर नोकर आहे आणि नोकरांनी असं मालकांबरोबर येऊन जेवायला बसायचं नसतं. तेव्हा ती उठायला जाते तितक्यात श्रीकांत तिला थांबवतो आणि बस जेवायला असं सांगतो. त्यानंतर जेवण सुरू असतानाच पारू बंगल्याबाहेर येते आणि सावित्रीला आवाज देते. सावित्री बाहेर जाते तेव्हा पारूने श्रीकांतसाठी लापसी बनवून आणलेली असते आणि ती लापसी ती सावित्रीला देते आणि सांगते की, हा डबा तू श्रीकांत सरांपर्यंत पोहोचवू शकतेस का?, त्यानंतर सावित्री तो डब्बा घेऊन येते, तेव्हा श्रीकांत विचारतो काय आहे त्या डब्ब्यात. तेव्हा सावित्री सांगते की, हा डबा पारुने पाठवला आहे त्यात लापसी आहे. तेव्हा अहिल्यादेवी विचारतात की, पारूने आपल्या किचनमध्ये येऊन हे बनवलं का? यावर सावित्री नाही असं सांगते आणि तिने तिच्या घरून बनवून दिला आहे असं सांगते.
त्यावर दामिनी पारुची लायकी काढते आणि म्हणते की, आता नोकरांचा सुद्धा शेजार धर्म आपण पाळायचा का?, यावर अहिल्यादेवी दामिनीला उत्तर देत म्हणतात की, असंच असेल तर तू आज आमच्याबरोबर या डायनिंग टेबलवर जेवायला बसली नसतीस, कारण आज तू नोकर आहेस. हे ऐकल्यावर दामिनी शांत होते आणि शांतपणे जेवू लागते. त्यानंतर सगळेचजण लापशी खातात आणि पारूने बनवलेल्या या लापशीचं भरभरून कौतुक करतात. तर इकडे पारूला प्रसन्न वाटतं की, सगळ्यांनी लापशी खाल्लेली असते. आता मालिकेत पुढे काय होणार, दोन-तीन दिवस प्रमोशनसाठी बाहेर जाणार तेव्हा दिशा काही वेगळा डाव आखणार नाही ना?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.