Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे दिशा व प्रीतम यांचं लग्न लागणार असतं. तर तिकडे पारू गावाकडे जाऊन आबासाहेबांना सर्व सत्य सांगून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते मात्र आबासाहेब काही तयार होत नाही. त्यानंतर पारू तिच्या वाटेला पुन्हा परतते. आदित्यलाही कळतं की, पारू कडून काहीच झालेलं नाहीये तेव्हा तो मिहीरला म्हणून फोन करायला जातो. मिहीरच्या फोनवर फोन करतो तर त्याला कळतं की मिहीरचा मेजर असा एक्सीडेंट झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येत आहे. हे ऐकल्यावर आदित्य मिहीरला बघायला म्हणून घराबाहेर पडतो. तर इकडे गणी मारुतीकडे हट्ट करतो की मला आत्ताच्या आत्ता तायडीशी बोलायचं आहे.
त्यामुळे मारुती पारुला फोन लावून देतो. गणी व पारू एकमेकांशी बोलत असतानाच पारूची गाडी ओंडके लावून थांबवण्यात येते आणि पारूला काही माणसं घेऊन जाताना दिसतात आणि तो सगळा आवाज गणी ऐकतो आणि गणी हे सगळं काही मारुतीला सांगतो की, पारू आपली संकटात आहे. त्यानंतर मारुती आदित्यला फोन करुन याबाबत सांगतो. आदित्यलाही खूप मोठा धक्का बसतो. आदित्यला काय करु काय नको हेच कळत नाही. तर इकडे प्रीतमला दिशाबरोबर हे लग्न करायचं नसतं त्यामुळे प्रीतम अहिल्या देवींना रूममध्ये घेऊन येतो आणि सांगतो की मला हे लग्न करायचं नाहीये. मात्र अहिल्या देवी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
आणखी वाचा – मोठी घोषणा! अभिनेते सयाजी शिंदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय नेत्यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न
अहिल्यादेवी सांगतात की, तू या आधी किती मुलींना फसवलं आहे ते मला माहित आहे आणि आदित्यने तुला वेळोवेळी सोडवले आहे. मात्र प्रीतम सांगतो की, या वेळेला मी खरं बोलतोय. एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझाच मुलगा आहे ना?. ती दिशा आपलं घर उध्वस्त करेल हे मला पहावणार नाही. ती चांगली मुलगी नाही आहे. मी पहिल्यासारखा आधीचा प्रीतम राहिलो नाहीये. मी आता बदललो आहे. तू एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव, असं म्हणत प्रीतम रडू लागतो. तेव्हा अहिल्या देवी त्याला म्हणतात, तू इतका मोठा केव्हा झाला हे मला कळलं नाही. त्यानंतर अहिल्यादेवी सांगतात की, तू फक्त एकदा नकार दे.
आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सुप्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह गुपचूप उरकलं लग्न, साधेपणाचं कौतुक
मी हे लग्न थांबवेल मग जी काय आपली नाचक्की होईल, जी काय माझी नाचक्की होईल, आपल्या कंपनीचे जे काही नुकसान होईल ते स्वीकाराला मी तयार आहे. हे ऐकताच प्रीतम नाही असं म्हणतो आणि म्हणतो की मी या लग्नाला तयार आहे आणि असं म्हणून निघून जातो. आता अहिल्यादेवीच प्रीतम आणि दिशाच हे लग्न थांबवणार का?, तर इकडे आदित्य पारुला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवेल का?, हे पाहणं रंजक ठरेल.