नातं वाचविण्यासाठी आनंदी उचलणार कोणतं पाऊल?

nava gadi nava rajya
nava gadi nava rajya

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेला आणि मालिकेतील पात्रांना अक्षरशः रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. या मालिकेचे कथानक हे कौटुंबिक असलं तरी रोजच्या जीवनापेक्षा वेगळे कथानक यांत हाताळले जात आहे. नात्यामधली भावनिक गुंफण कालांतराने कसे पदर उलगडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. (nava gadi nava rajya)

photo credit : google

जस संसार म्हटलं की त्यात चढ उतार आले तसंच मालिकेच्या बाबतीतही आहे. कधी सुखाच्या सरी तर कधी दुःखाचा डोंगर करून समोर असलेल्या मालिका आपण एकटक पाहतो. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील आनंदी लग्नानंतर आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला कसं सामावून घेते आणि आपलंस करते हे आपण पाहिलंच. ज्यावेळी राघवला आनंदीची किंमत कळते त्यानंतर तो आनंदीवरील त्याच प्रेमही व्यक्त करतो. आनंदी आणि राघव यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरु असताना त्यांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागते आणि सर्वकाही बिघडतं.

पहा आनंदी राघवच्या संसारात पडणार का फूट (nava gadi nava rajya)

ज्यावेळी आनंदी रमाच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी राघवला रमाच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. त्यानंतर राघव आनंदीमुळे रमाजवळ येतो. आनंदीचा वापर करून तो रमाच्या संपर्कात राहतो. रमा फक्त आनंदीला दिसते ही गोष्ट राघवने मान्य केली असली तरी रमा आनंदीला लग्नाच्या दिवसापासून दिसते ही गोष्ट राघवपासून लपवून ठेवली म्हणून तो आनंदीला दोष देतो आणि स्वार्थी ठरवतो.

आनंदीने स्वतःच स्थान मिळवण्यासाठी रमाचा वापर केला, राघवच्या जवळ जाण्यासाठी आनंदीने ही गोष्ट लपवून ठेवली असे आरोप तो आनंदीवर करतो. रमा आपल्या अस्तित्वाची जाणीव राघवला झाली म्हणून आनंदी आणि राघव दुरावले असा विचार करून स्वतःला दोषी ठरवते.(nava gadi nava rajya)

====

हे देखील वाचा – ‘मी मूळचा कलावंत नव्हे..’ असे म्हणणाऱ्या दादा कोंडकेंनी गाजवलं सिनेविश्वात एक युग

====

आनंदीने राघवपासून रमाचे अस्तित्व लपवून स्वतःचा फायदा केला अशा गैरसमजात राघव अडकलेला असतो. आता आनंदी राघवचा हा गैरसमज दूर करेल का? की रमा आनंदी आणि राघव यांच नातं पुन्हा सुरळीत होण्यासाठी स्वतःच निघून जाईल, हे पाहणे मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

photo credit : google
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
(nava gadi nav rajya)
Read More

आनंदी करणार बिझनेस, राघव करेल का तिचा पुन्हा स्वीकार?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर…
Prajakta Mali
Read More

प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्रीने मालिका,चित्रपट आणि वेब…
Sheetal Kshirsagar
Read More

सिम्मी काकूंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट करत दिली गुडन्यूज

शीतल क्षीरसागर ही मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारून आपली स्वतःची…
ashok saraf siddharth jadhav
Read More

‘मी पुन्हा निरुत्तर झालो..’ असे म्हणत अशोक मामा झाले भावुक

सिनेविश्वात आपल्या अंगी असलेल्या कलेने साऱ्या रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांचे करावे तितके कौतुक कमीच. आजवर…
(akshaya naik)
Read More

अखेर अक्षयाच्या त्या फोटोमागील गुपित उलगडलं..

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका…