संगीत विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध व लोकप्रिय संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका, भवतारिणी यांचे निधन झाले आहे. भवतारिणी यांचे काल (२५ जानेवारी) रोजी कर्करोगाने निधन झाले. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भवतारिणी यकृताच्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी श्रीलंकेला गेल्या होत्या. मात्र, काल सायंकाळी पाचच्या सुमारास भवतारिणी यांची प्राणज्योत मालवली.
भवतारिणी या ४७ वर्षांच्या होत्या. भवतारिणी या संगीतकार इलैयाराजा यांच्या कन्या तर कार्तिक राजा आणि युवान शंकर राजा यांची बहीण होत्या. भवतारिणी यांनी रासैया (१९९५) मधून गायिका म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले होते. भारती (२००१) चित्रपटातील मायल पोला पोन्नू ओन्नू या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. इलैयाराजा यांच्या कन्या भवतारिणी या पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या.
Shell Shocked! Isaignani Ilayaraja 's daughter and Singer #Bhavatharini (47) passed away in Srilanka this evening! #OmShanti pic.twitter.com/vcw1cevCPB
— Sreedhar Pillai (@sri50) January 25, 2024
आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”
तमिळमध्ये यशस्वी कारकीर्द केल्यानंतर, भवतारिणी यांनी ‘अवुना’ चित्रपटाद्वारे तेलुगु चित्रपट क्षेत्रातदेखील पदार्पण केले. शिल्पा शेट्टी, अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांच्या भूमिका असलेल्या ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले होते. भवतारिणी यांनी रासैय्या नावाच्या सिनेमातून पार्श्वगायन सुरु केलं. तसंच इलैयाराजा आणि कार्तिकराजा तसंच युवान शंकर राजा यांच्यासाठीही त्यांनी गाणी म्हटली. संगीतकार देवा आणि सिरपी यांच्यासाठीही गाणी गायली होती.
‘मायनिधी’ हा भवतारिणी यांचा संगीत लाभलेला शेवटचा अल्बम ठरला. त्यांनी कधालुक्कु मरियाधई, भारती, अजागी, फ्रेंड्स, पा, मनकथा आणि अनगेन यांसारख्या तमिळ चित्रपटांसाठीदेखील गायन केलं आहे. दरम्यान, भवतारिणी यांच्या जाण्याने संगीत विश्वात एक पोळकी निर्माण झाली असून त्यांच्या निधनावर अनेक चाहते व रसिक श्रोत्यांनी शोक व्यक्त केला आहे.