बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची निर्मिती असलेली ‘बम्बई मेरी जान’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. मुंबई अंडरवर्ल्डबाबत ही वेबसीरिज आधारित असून या वेबसीरिजमध्ये अभिनेता के के मेनन व अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसत आहे. एकीकडे या वेबसीरिजची चर्चा सुरु असताना आता ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, या वेबसीरिजच्या नावावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ही वेबसीरिज पाहून यावर योग्य निर्णय घेणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. (Amey Khopkar warns Bambai Meri Jaan Webseries)
अमेय खोपकर यांनी ‘बम्बई मेरी जान’ वेबसीरिजच्या नावासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी वेबसीरिजचे काही फोटोज शेअर केले आहे. तसेच ‘भारत’ आणि ‘इंडिया’ नावाच्या वादाचाही उल्लेख करताना त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राचा उल्लेख केला आहे. या ट्विटमधून अमेय खोपकर यांनी आपण ही सीरिज पाहून निर्मात्यांना वेबसीरिजच्या नावावर योग्य निर्णय न घेतल्यास ‘खळ्ळ खटॅक्क’चा इशारा दिला आहे.
अमेय खोपकर या ट्विटमध्ये म्हणाले, “‘नावात काय आहे?’ असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या ‘इंडिया’ ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग.. ‘भारत’ नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई’च्या नामबदला संदर्भात इतके उदासीन कसे?”
हे देखील वाचा – “सुशिक्षित आहेस ना?”, नो एन्ट्रीमधून जाणाऱ्यावर भडकला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तू वागतो ते…”
"नावात काय आहे?" असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते!
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 14, 2023
फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे… pic.twitter.com/sD5bD3mauW
पुढे ते म्हणाले, “जर ‘क्रिएटिव्हिटीच्या’ नावाखाली कितीही गरज पडत असेल, तरी आपल्या शहराच्या जुन्या नावाचे फलक गावभर लावणे आणि टाईम्स ऑफ इंडिया सारख्या नामांकित जबाबदार वृत्तपत्राने आपली ओळख बदलून काही पैशांसाठी लाचारीने हे जुने नाव मिरवणे, हे सुद्धा अजिबात बरे नाही! अहो ‘बॉम्बे‘ आणि ‘बम्बई‘चे ‘मुंबई‘ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले. हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी लोकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे.”
हे देखील वाचा – “गणपतीच्या मंडपात पत्त्यांचे डाव अन्…”, मिलिंद गवळींचं सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले, “मुलं दारू पिऊन…”
असो.. अजून मी ही वेबसीरिज पाहिलेली नाही. पण बघतोच! आणि मुंबई ऐवजी ‘बम्बई’ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो.. पटलं तर ठीक आहे.. अन्यथा खळ्ळ खटॅक्क!!”, असं म्हणत अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना इशारा दिला आहे.