सुरुची व पियुष यांनी गुपचूप लग्नसोहळा उरकल्याचं समोर आल्यापासून त्यांच्या लग्नाबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नसोहळ्यातील समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्या लूकची जोरादार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. शाही थाटामाटात त्यांचा लग्नसमारंभ उरकला असल्याचं समोर आलं. सुरुची अडारकरचं हे पहिलंच लग्न आहे. तर पियुष हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. लग्नसोहळ्यानंतर सुरुची व पियुष यांनी त्यांचे हळदी समारंभाचे तसेच त्यांचा रिसेप्शन सोहळ्याचेही फोटोस सोशल मीडियावरून शेअर केले. (Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding)
सुरुची व पियुष यांनी लग्न करण्याचं केव्हा ठरवलं, त्यांचं नातं पुढे नेण्याचं त्यांनी केव्हा ठरवलं याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं आहे. ‘इट्स मज्जा’ने सुरुची व पियुष यांचं केळवण स्पेशल अशी मुलाखत केली. यावेळी बोलताना दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल तसेच त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ मधील जेठालालच्या लेकाच्या लग्नाची चर्चा, सूनही आहे कलाकार, पाहा खास फोटो
पियुषशी लग्न करण्याचं कधी ठरवलं? असा प्रश्न सुरुचीला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, अंजली मालिकेपासूनच हा एक चांगला व्यक्ती आहे हे मला कळालं होतं. जेव्हा आम्ही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आलो तेव्हा त्याच्या बोलण्यामधून मला वेगवेगळ्या गोष्टी कळत गेल्या. त्याची वेगळीच बाजू मला कळाली. त्याची ती बाजू कोणीच पाहिली नाही. एकतर तो खूप कमी बोलतो. पियुषला बोलतं करणं म्हणजे मोठा टास्क आहे. त्याच्या कलेने मी सगळ्या गोष्टी घेतल्या. त्याची हळवी बाजू जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा हाच तो मुलगा आहे हे मी ठरवलं. आयुष्यभरासाठी हाच मला हवा आहे हे आम्ही ठरवलं.
लग्न करण्यासाठी मानसिकरित्या धाडस केलं. ही हिम्मत तुझ्यामध्ये कुठून आली? असा प्रश्न विचारताच सुरुची म्हणाली, मी माझ्या आईमध्ये हे सगळे गुण पाहिले आहेत. माझी आई मध्यप्रदेशची आहे. ती लग्न करुन इथे आली. त्यामुळे इथे तिचा कोणीच मित्र परिवार नाही. आजही तिचे कुटुंबीय इकडे येत नाहीत. त्यामुळे भावनिक प्रसंगांचा सामना करत ती इथवर पोहोचली आहे. लहानपणापासून मी तिच्याकडून एक गोष्ट शिकली आहे की, कोणताही प्रसंग आला की, आपण त्याचा खंबीरपणे सामना केला पाहिजे. माझ्या बऱ्याच गोष्टींमधून मी खूप काही शिकत गेले. मी गोष्टींचा खूप विचार करते. तसेच बाबांकडून माझ्यामध्ये सकारात्मकता आली.