vijay patwardhan : मालिकेतील कलाकारांनी आपल्या कामाचा मोबदला मिळाला नाही म्हणून अनेकदा आवाज उठविला. अनेक असे मराठी कलाकार आहेत ज्यांना अनेक वर्ष काम करुनही त्यांना त्यांचे मानधन मिळाले नाही. हा पैसे थकबाकीचा मुद्दा कलाकारांना काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकरने हे मन बावरे मालिकेत काम केल्याचे पैसे न मिळाल्यावरुन आवाज उठविला. मालिका प्रचंड गाजली पण नंतर ती संपताच काही काळाने त्याबाबतचे वाद देखील समोर आले. मग हळू हळू आणखी काही कलाकार यावर व्यक्त झाले. त्यांनतर मानधन न दिल्याचा आरोप याच मालिकेत काम करणाऱ्या विजय पटवर्धन यांनी केला. या थकबाकी प्रकरणावर आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
विजय पटवर्धन यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींबाबत खुलेआमपणे भाष्य केलं. यावेळी बोलताना विजय यांनी त्यांच्या थकलेल्या रकमेवर भाष्य केलं. विजय म्हणाले, “पैसे बुडवण्याचे प्रकार वेगळे नाहीत जसे इतर ठिकाणी बुडतात त्याच पद्धतीने बुडवतात. फक्त इकडे तीन महिन्यानंतर पेमेंट केलं जातं. मालिकांसाठी वगैरे तर काही वेळेला ते तीन महिन्यांचे चार महिने होतात, मग कधी पाच महिने होतात, सहा महिने होतात आणि मग मालिका संपते”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हार्ट अटॅकची बातमी खोटी; कुटुंबीयांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
पुढे त्यांनी म्हटलं, “अशा वेळेला आणि मग प्रोड्युसर्स म्हणतात की, आता मालिका संपली. आता पैसे नाहीत. मी पोस्ट केली होती ते अजूनही अनेक मोठ्या कलाकारांची पोस्ट गाजते आहे. आणि ते बरोबर आहे. त्यांच म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. मीही त्यांच्या लायनीतलाच आहे. त्याचे जर का जास्त राहिले असतील तर त्यापेक्षा थोडेसे कमी माझे पण राहिले आहेत”.





