kashmira kulkarni injured leg : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनी या दोन जोड्यांनी तर रसिकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाहीतर मालिकेत रम्या हे पात्रही तितकंच गाजलं. ज्ञानदा रामतीर्थकर, मृणाल दुसानिस, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका या मालिकेत आहेत. त्याचबरोर कश्मिरा कुलकर्णीनं ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये रम्याची खलनायिकेची भूमिका साकारली आहे. काव्या प्रेग्नन्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे रम्याच्या मनात तिच्याबाबत रा निर्माण झाला आहे. काही ना काही कारण काढून रम्या काव्याला त्रास देत असते.
अशातच आता रम्या ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आणि त्यावर तिला शस्त्रक्रिया सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता अभिनेत्री मालिकेतून ब्रेक घेणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर आता नुकत्याच इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर
कश्मिरा म्हणाली, “एसिअल कट आहे आणि डॉक्टरांनी सर्जरी सांगितली आहे. मला सेटवर खूप सपोर्ट करतायत. लागलेलं आहे हे कळल्यावर त्यांना लगेच रिपोर्ट्स पाठवले. सगळे खूप प्रेमाने काळजी घेतायत. एकतर बसून किंवा उभं राहून डायलॉग्स, असं सगळं चालू आहे. हालचाल नाही करता येत. पण, बऱ्याचदा आपण मानसिकरीत्या तयार असतो तेव्हा सगळं होतं नीट”. पुढे अभिनेत्रीला, मालिकेतून ब्रेक घेणार का? असं विचारलं असता कश्मिरा म्हणाली की, “अजून एक-दोन डॉक्टरांना विचारतेय. त्यांचंही जर तेच मत असेल तर मग मला ब्रेक घ्यावा लागेल. सर्जरी म्हटलं तर तीन, साडेतीन महिने मला त्यासाठी द्यावे लागतील. पण, तेवढं ऍडजस्ट करायला सांगणं मलाच योग्य वाटणार नाही”.
आणखी वाचा – “मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…
‘कथानकाप्रमाणे गोष्टी पुढे घेऊन जायच्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांना वाट बघत ठेवणं बरोबर नाही वाटत. कदाचित जर तसं झालं तर ब्रेक घेईन.’ असंही कश्मिरानं पुढे सांगितलं. त्यामुळे आता वैयक्तिक करणामुळे कश्मिरा म्हणजेच मालिकेतील रम्याने मालिकेतून एक्झिट घेतली तर कथानक कसं फिरणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.





