पहलगाम हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यात आपला जीव गमावलेल्य पर्यटकांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं. फक्त धर्म हिंदू म्हणून गोळीबार केलेल्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी म्हणून प्रत्येकजण सरकारकडे मागणी करत आहेत. हल्ल्यात ज्या कुटुंबियांनी आपल्या जवळची मंडळी गमावली त्यांचा आक्रोश पाहवतही नाही. त्यांची आज झालेली परिस्थिती यांस जबाबदार कोण? हा प्रश्न विचारला जात आहे. अशातच कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने या हल्ल्याबाबत दहा महत्त्वाचे मुद्दे मांडले ा हल्ल्याबाबत दहा महत्त्वाचे मदआहेत. याला अनेकांनी सहमती दर्शवली आहे. (pahalgam terror attack)
मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा समीर परांजपेने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पहलगाम हल्ल्यातील एक फोटो शेअर केला. यावेळी त्याने सरकारला अनेक प्रश्न विचारले. तो नक्की काय म्हणाले हे जाणून घेऊया.
समीर परांजपेचे दहा महत्त्वाचे मुद्दे
बास झालं…बास झालं…
त्यानंतर संताप, राग, चीड, द्वेष हे सगळं आहेच. पण आता पावलं उचलणार म्हणजे काय करणार? कंठस्नान वगैरे घालाल तुम्ही यात शंका नाही. पण ही किड संपवायला कायमची आणि ठाम पावलं उचलायची असतील तर भारताचा एक नागरिक म्हणून मला वाटतं…
१) भारताची उपराजधानी, उन्हाळी राजधानी श्रीनगर घोषित करा.
२) मार्च ते मे असे वर्षातले ३ महिने गृहमंत्र्यांच्या ऑफिसचा कारभार काश्मीरमधून चालावा. कारण एवढंच की नुसत काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे हे भाषणात बोलून चालणार नाही ते दाखवून ही दिलं पाहिजे.
३) दरवर्षी संसदेच एक सत्र कायम काश्मीरमध्ये व्हावं.
४) राष्ट्रपती भवन काश्मीरला हलवण्यात यावं.
५) स्थानिक असंतोषाच्या आईचा भोस@#. आता सरकार ठरवेल त्याचं आणि इतर राज्यात जशा ओपन पद्धतीने गोष्टी होतात तशाच गोष्टी इथे होणार ज्यांना आक्षेप आहे त्यांनी उपाशी मरा. देशात अनेक गोष्टी दाबल्या जातात या छोट्या-मोठ्या असंतोषाच्याही दाबून टाका.
६) ज्या व्हॅलीमध्ये हे घडलं त्या पहलगाम व्हॅलीचे नाव हिंदू व्हॅली असं करण्यात यावं. ही मागणी एवढ्याच साठी की जे झालं ते पिढ्यान् पिढ्या आंधळ्या हिंदू जनतेला कळत राहावं.
७) मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन काश्मीरमध्ये करावं. अनायसे गृहमंत्र्यांचे सुपुत्र आयसीसी चेअरमन आहेत त्यामुळे हे होऊच शकतं. तसं इन्फ्रा नसेल तर उभं करा.
८) RSS ने दसरा संचलन दर २ वर्षांनी नागपूर ऐवजी काश्मीरमध्ये करावं.
९) या प्रसंगानंतर पर्यटक रोडवण्याची शक्यता आहे ते होऊ नये यासाठी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करा. देशातले झाडून सगळे VIP जे ३ दिवस अंबानींच्या लग्नात पैसे घेऊन घरंच लग्न असल्यासारखे नाचले होते ते सगळे उत्तम पैसे देऊन आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेऊन या महोत्सवासाठी काश्मीरमध्ये आणा. राज्याचे आणि देशाचे ॲम्बेसेडर म्हणून… सोबत सर्व इस्लामी देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करा.
१०) आर्मी चीफ यांचा ऑफिसचा कारभारही काही महिने काश्मीरमधून चालावा.
तसंही भरमसाठ कर देतोच आहोत आम्ही… पण या सगळ्यासाठी जो काही तिजोरीवर खर्च येईल तो आमच्यावर कर रूपाने टाकलात तरी आमची हरकत नाही. पण हे एवढं कराच. हे सगळं किंवा यातलं काही टक्के जरी झालं तर RDX आणि हत्यारे वगैरे सोडा, साधी टाचणीसुद्धा या राज्यात पोहचू शकत नाही. याची मला देशाचा नागरिक म्हणून खात्री आहे.
जय हिंद. जय हिंदू. समीरने त्याच्या पोस्टद्वारे मांडलेली ही तळमळ खरंच दखल घेण्याजोगे आहे. त्याच्या या पोस्टला सगळ्यांनीच सहमती दर्शवली आहे.