Jawan Murali Naik : “देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन”, हे शेवटचे शब्द त्या आई-वडिलांच्या कानावर पडले आणि नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भारत-पाकिस्तान युद्धात मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या मुरली नाईक या जवानाला वीरमरण आले. युद्धादरम्यानच देशसेवेत असणाऱ्या मुरली नाईक यांना उरी येथे संरक्षणाला जाण्याचा कॉल आला. उरीला जाण्याआधी त्याने आई-वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत धीर दिला. यावेळी त्या आईचे हृदय पिळवटून निघाले होते, तिच्या जीवाची घालमेल होत होती. पण देशसेवा करणं यावेळी किती गरजेचं आहे हे त्या मायला पटवून देत मुरली देशाच्या सेवेला लागला.
मूळचे आंध्रप्रदेशचे असणारे आंध्र प्रदेशमधील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील कल्की तांडा येथे राहणारे हे नाईक कुटुंब. गेल्या ४० वर्षांपूर्वी हे नाईक दाम्पत्य मुंबईत कामानिमित्त आले. आणि इथेच स्थायिक झाले. मुरली नाईक यांचा जन्म मुंबईतच झाला. वय वर्ष २५. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी या जवानाला वीरमरण आले. अत्यंत बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेत मुरली यांनी देशसेवेचे स्वप्न पूर्ण केलं. घरची परिस्थिती कठीण असतानाही त्याच्या आई-वडिलांनी त्यांच्या एकुलत्या एक लेकाला काहीच कमी पडू दिले नाही.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा
वडील मुंबईत बिगारीचे काम करतात तर आई घरकाम करते. घाटकोपर येथे कामगार नगर या वस्तीत ते राहत होते, मात्र ही वस्ती काही दिवसांपूर्वीच पुनर्विकासासाठी गेल्याने सध्या ते भाड्याच्या घरात आहेत. मुरली नाईक यांना वीरमरण आले तेव्हा त्याचे आई-वडील हे आंध्रप्रदेश येथील त्यांच्या गावी कार्यक्रमानिमित्त गेले होते. लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच मुरली यांच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली तर आईने टाहो फोडला.
आणखी वाचा – अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…
कमी वयात देशसेवेत रुजू होणारा हा तरणाबांड लेक आता या जगात नाहीत, त्याने देशसेवेत स्वतःचे सर्वस्व अर्पण केले हे कळताच आई-वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनाच झाले. मातृत्वापुढे देशभक्ती ठरली असं म्हणणं यावेळी वावगं ठरणार नाही. तर मुरली नाईक यांच्या वडिलांनी “माझ्या लेकाला देशसेवेत वीरमरण आले याचा आम्हाला अभिमान आहे”, असं म्हणत डोळ्यातील अश्रूंना आधार दिला. तर आईच्या काळजाने मात्र लेकाच्या निधनाचा घेतलेला धसका काही सोडलेला नाही.