भारतात गेले काही दिवस विश्वचषकाचा रंग चढला होता. भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचू विश्वचषक आपणच जिंकणार असा विश्वास भारतीयांना होता. १९ नोव्हेंबर या दिवसाची सुरुवात भारतीयांसाठी खूप उत्साहात झाली होती पण दिवसाचा शेवट सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. रविवारी अंतिम सामना पाहण्यासाठी बऱ्याच जणांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा व अथिया शेट्टी यादेखील फायनल पाहण्यासाठी अहमदाबाद स्टेडियमवर पोहोचल्या होत्या. पण अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सगळ्यात पराभवापेक्षा क्रिकेटर हरभजन सिंगच्या समालोचनाची (कॉमेंट्री) चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांकडून त्याच्या समालोचनाची (कॉमेंट्री) निंदा होताना दिसत आहे. (Harbhajan singh remark on anushka and athiya )
विश्वचषकाच्या अंतिम सामना भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. हा सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बॉलिवूडचे बरेच कलाकार उपस्थित होते. भारताने फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचं लक्ष दिलं. यादरम्यान कॉमेंट्री करत असताना हरभजन सिंगने केलेल्या वक्तव्याची निंदा होत आहे. तो म्हणाला, “क्रिकेटबद्दल बोललं जात आहे की चित्रपटांबद्दल याचा मी विचार करत होतो. कारण क्रिकेटबाबत तर काही माहित नाही आणि तेवढी समजही नाही”. हे हरभजन सिंह तेव्हा म्हणाला जेव्हा केएल राहुल व विराट कोहली एकत्र मैदानात होते आणि तेव्हाच स्क्रीनवर अनुष्का व अथियाचीही झलक दाखवण्यात आली होती.
@harbhajan_singh What do you mean that the ladies understand cricket or not?? Please apologise immediately. @AnushkaSharma@theathiyashetty@klrahul@imVkohli#INDvsAUSfinal #INDvAUS #ICCWorldCupFinal pic.twitter.com/8gKlG8WvJP
— Arunodaya Singh (@ArunodayaSingh3) November 19, 2023
जसा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला तेव्हा तो बराच व्हायरल झाला. हिंदी कॉमेंटेटर्सना त्यांच्या या टिप्पणीसाठी बरेच ट्रोल झाले आहे. त्यांच्या या कॉमेंट्रीसाठी निंदा केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हिंदी (कॉमेंटेटर्स) समालोचनांना (समालोचन) थेट अनुष्का शर्माच्या क्रिकेटच्या समजूतीवर उघडपणे खिल्ली उडवली आहे. भाऊ आपण कधी सुधारणार? ती फक्त अनुष्का नाही तर ती विराट कोहलीची पत्नीही आहे. ज्याने नुकताच इतिहास रचला आहे आणि इतके लोक बघत असताना एखाद्यची खिल्ली उडवणे ही किती चुकीच आहे. त्याने माफी मागितलीच पाहिजे”.
विश्वचषकाचा सामना हरल्यानंतर संपूर्ण देशाला खूप वाईट वाटलं. विराट कोहलीपासून रोहित शर्मासह सगळ्या खिळाडूंच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यापासून विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हा विश्वचषक आपलाच आहे असं सगळ्यांना वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. यासगळ्यात हरभजन सिंगने केलेली ही कमेंट खूप चुकीची व निंदास्पद ठरली.